31 January, 2012

रामायणाची रचना कशी झाली ?

        महर्षि वाल्मीकि पूर्वायुष्यात वाटमारीचे अधम कृत्य करीत असता त्यांना ब्रह्मर्षि नारदमुनींचा सत्संग घडला. नारदाने उपदेश केल्यावर वैराग्य आले आणि नारदांच्या उपदेशानुसार त्या वाटमार्‍याने तप करण्यास आरंभ केला. एकाग्र चित्ताने अहर्निश ईश्वराधना, ध्यानसाधना करण्यांत तो इतका तल्लीन झाला की त्याला बाह्य जगच काय पण देहभानाचाही विसर पडला. तपात निमग्न झालेल्या त्याचे शरीर काष्ठवत झाले. त्या शरीराला काष्ठ समजून किडा-मुंग्यांनी त्यावर वारूळ रचले. अनेक वर्षे लोटली. आणि एके दिवशी एका गंभीर वाणीने त्यांचे ध्यान भंगले. घनगंभीर आवाजात त्यांना कुणी म्हणत होते - ’महर्षि, उठा आता.’ तो चकित झाला. म्हणाला, ’कोण महर्षि ? मी तर एक लुटारू आहे.’ ती वाणी त्याला म्हणाली, ’नाही ! आता तुम्ही पापाचार रत असणारे लुटारू राहिला नाहीत. तुमचे हृदय आता पवित्र झाले आहे. सर्व पापांचा लय झाला आहे. तुमच्या देहाभोवती ’वल्मीक’ (वारूळ) उभारल्यामुळे तुम्ही आता वाल्मीकि नावाने प्रसिद्ध व्हाल. अशा रीतीने तो लुटारू कठोर तपश्चर्येच्या प्रभावाने महर्षि वाल्मीकि झाला.
        पुढे वाल्मीकिने एक आश्रम स्थापन केला. अध्ययन, अध्यापन सुरू झाले. मोठा शिष्य परिवार जमा झाला. एकदा महर्षि नदीवरून स्नान करून वनातील निसर्ग सौंदर्य अवलोकन करीत आश्रमाकडे परतताना एक चित्तवेधक घटना घडली. एक क्रौंच पक्ष्याचे जोडपे प्रणयक्रीडेत दंग झाले होते. निसर्ग दृष्य, वनातील रम्य वातावरणामुळे महर्षिंचे हृदय आनंदाने भरले होते. त्यात त्यांचे क्रौंच पक्षाच्या जोडप्याकडे लक्ष गेले. त्यांचे विहार कौतुकाने पहात असता एकाएकी एक बाण सूं सुं करत आला आणि त्याने नर-क्रौंचाचा वेध घेतला. तत्काळ तो गतप्राण होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. त्या पक्ष्याचे जीवन संपले. क्रीडेचे रूपांतर अचानक शोकावस्थेत झाले. क्रौंचिण हृदय विदारक विलाप करू लागली आणि ते पाहून महर्षिंचे हृदय द्रवले. त्यांनी एकडे तिकडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की हे क्रूर कर्म एका व्याधाने केले आहे. त्यांना फार दुःख झाले. त्या शोकावेगात त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. आपल्या मुखातून काव्यमय श्लोक बाहेर पडल्याचे ध्यानात आल्यावर त्याचा त्यांनाच विस्मय वाटला. खरे पाहता यात आश्चर्य करण्यासारखे असे काही नाही. शास्त्रांत अनेक ठिकाणी उल्लेख सापडतात की तपाचरणाने मनुष्याच्या चित्त-वृत्ति शुद्ध होतात. क्रोध मत्सरादि दोष नाहिसे झाल्यामुळे हृदय निर्मळ होते, कोमल होते. असे हृदय जेव्हां समत्वबुद्धि, करुणा, प्रेम यांने द्रवित होते तेव्हां आपोआपच काव्य स्फुरते. पण महर्षिंना आपल्या तोंडून काव्य बाहेर पडल्याचे जाणवून अचंबा वाटला. महर्षि विचार करू लागले, अशा प्रकारची श्लोकवाणी माझ्या मुखे तर कधी बाहेर पडली नाही. काय बरे असेल हें ? या वरून मी काय समजावे ? इतक्यांत त्यांना एक वाणी ऐकूं आली. "तुझ्या मुखातून जे बाहेर पडले त्याला कविता म्हणतात. आता तूं जगत् कल्याणास्तव अशा प्रकारे कविता रचून रामचरित्राचे वर्णन कर." ही वाणी देववाणी म्हणा, आकाशवाणी म्हणा वा मुनिंच्या हृदयांतून निघालेली अंतःप्रेरित वाणी म्हणा; पण महान कार्ये करणार्‍या काहींना अशा प्रकारे अमानवी प्रेरणादायी संदेश मिळाल्याचे अनेक दाखले आहेत.
      प्रथम महाकाव्य निर्मितीचा हा इतिहास. महर्षि वाल्मीकींच्या हृदयातील करुणा त्यांच्या मुखावाटे श्लोकरूपाने बाहेर पडून विश्वातील आदि काव्य निर्माण झाले. हे काव्य म्हणजे परम मनोहर, रमणीय रामायण कथा. एका महान दिव्य विभूतीचे चरित्र. ह्या आधी संस्कृत भाषेत काव्य नव्हते असे नव्हे. वैदिक साहित्य हे तर रामायणाच्या बरेच आधीचे असून ते सर्व छंदोबद्ध, म्हणजेच पद्यात आहे. तरी देखील भारतात सर्वानुमते रामायणाला आदिकाव्याचा मान मिळाला आहे. हे काव्य तर इतके प्रभावी झाले आहे की भारतीय लोकवाणीत श्रीरामाएवढे रुजलेले दैवत दुसरे नाही. या काव्याने प्रेरित होऊन कितीतरी संतांनी कितीतरी भाषांमधून रामकथा रचल्या आहेत. तुलसीदास, एकनाथ, रामदास, श्रीधर कवि, कंबन (तामिळ), गुजराती भाषेतले गिरीधर रामायण, फारसी मध्ये मसीही रामायण ही सर्व प्रसिद्ध काव्ये थोर आणि उच्च कोटीची आहेत. एका संदर्भानुसार* जगातील ५०० भाषांमध्ये रामकथेची रचना केली गेली आहे. इंडोनेशियात कोर्टातून रामायणावर हात ठेऊन शपथ घेतली जाते यावरून दिसून येते की रामकथा किती जगन्मान्य झाली आहे. श्रीराम व रामकथा कधी कालौघात लुप्त होतील, नाहीशा होतील, विस्मृत होतील हे अशक्यप्राय आहे. आता अशा रामायणाबद्दल हे ऐतिहासिक का काल्पनिक काव्य, श्रीराम मानव का परमात्म अवतार या बद्दल अनेक मतमतांतरे आहेत. पण तो वेगळा विषय, पाहू नंतर कधीतरी.
       महर्षि वाल्मीकींनी वारूळातून बाहेर पडल्यावर रामायण काव्य रचण्यापर्यंत काय केले असेल. काय करणार ? इतर ऋषी मुनि जे करत होते तेच करणार. अध्ययन आणि अध्यापन. वेदाध्ययन, वेद शाखांचे अध्ययन, ब्रह्म विद्येचे अध्ययन आणि अध्यापन केले. ज्योतिष, आयुर्वेद, युद्धशास्त्र, योगशास्त्र इत्यादि शास्त्रांचा सखोल अभ्यासाचे त्यांच्या काव्यातून विपुल दर्शन होतेच. काव्यातील अयोध्याकाण्डाच्या सर्ग १०० मधे भरताचे कुशल विचारताना भरताला राज्य कारभारासंबंधी काय काय विचारले हे पाहिल्यावर राज्य कारभार, राजनीतिबद्दलचे महर्षिंचे ज्ञान पाहून थक्क व्हायला होते. एक साधु MBA न करता हे सर्व कसे जाणतो ? हा प्रश्न पडतोच.
    महर्षिंचा अनेक विषयांचा सखोल अभ्यास होताच. याव्यतिरिक्त त्यांना तपःसामर्थ्याने अवगत असलेल्या सिद्धींचेही दर्शन घडते. रामायण रचण्यासाठी महर्षिंनी आपल्या योगसामर्थ्याचा कसा वापर केला हे बालकाण्ड सर्ग ३ मधल्या खाली दिलेल्या श्लोक श्लोकार्थावरून स्पष्ट होते. 

रामलक्ष्मणसीताभी राज्ञा दशरथेन च ।
सभार्येण सराष्ट्रेण यत् प्राप्तं तत्र तत्त्वतः ॥ ३ ॥
हसितं भाषितं चैवं गतिर्यावच्च चेष्टितम् ।
तत्सर्वं धर्मवीर्येण यथावत् संप्रपश्यति ॥ ४ ॥
स्त्रीतृतीयेन च तथा यत् प्राप्तं चरता वने ।
सत्यसंधेन रामेण तत् सर्वं चान्ववेक्षितम् ॥ ५ ॥
ततः पश्यति धर्मात्मा तत्सर्वं योगमास्थितः ।
पुरा यत् तत्र निर्वृत्तं पाणौ अमलकं यथा ॥ ६ ॥


श्रीराम-लक्ष्मण-सीता तसेच राज्य आणि राण्यांच्यासहित राजा दशरथांशी संबंध असणार्‍या जितक्या गोष्टी होत्या - हसणे बोलणे, चालणे आणि राज्यपालन आदि जितक्या म्हाणून क्रिया झाल्या होत्या, त्या सर्वांचा महर्षिंनी आपल्या योगधर्माच्या बलाने उत्तम प्रकारे साक्षातकार करून घेतला. ॥ ३-४ ॥ सत्यप्रतिज्ञ श्रीरामचंद्रांनी लक्ष्मण आणि सीतेसह वनात विचरण करते समयी ज्या ज्या लीला केल्या होत्या, त्या सर्व त्यांच्या दृष्टीस पडल्या. ॥ ५ ॥     योगाचा आश्रय घेऊन त्या धर्मात्मा महर्षिने पूर्वकाली ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्या सर्व तेथे हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहिल्या. ॥ ६ ॥


*[ मुस्लिम बहुल इंडोनेशिया में रामायण को राष्ट्रीय पवित्र पुस्तक होने का गौरव प्राप्त है । वहां अदालतों में प्राय: रामायण पर हाथ रखकर ही शपथ ली जाती है। मलेशिया में "हिकायत सिरी राम" की पुस्तक के रूप में रामकथा को पढ़ा जाता है । थाईलैंड में रामकथा को "रामकियेन" या "रामकीर्ती" कहा जाता है । यहां के अधिकांश निवासी बौद्ध धर्म के उपासक हैं फिर भी यहां राम को बड़ी श्रृद्धा से देखा जाता है । वहां के लोगों का मानना है कि राम से संबन्धित संपूर्ण घटनाएं उन्ही की धरती पर हुई हैं । जावा में राम को पुरूषोत्तम के रूप में सम्मानित किया जाता है और वहां सरयू नदी भी है । इसी तरह लाओस में रामकथा के दो ग्रंथ उपलग्ध हैं- 1. फालाक फालाम और 2. फोमचक्र । वियतनाम (पुराना नाम चम्पा) में भी रामकथा के कई रूप प्रचलित हैं। बर्मा में "रामायागन" नाम से रामकथा लिखी गई । बर्मा में अनेक नाम राम पर आधारित हैं। रामकथा का प्रचार-प्रसार चीन, जापान में भी बहुत हुआ । ] 

10 January, 2012

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०७

श्लोक १०७
शंखभृन्नन्दकी चक्री शारङ्ग्धन्वा गदाधरः 
रथाङ्गपाणीरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः  ।।
(९९) शङ्खभृत् :  - पांचजन्य नावाचा दिव्य शंख धारण करणारा. पांचजन्य शद्बाचा अर्थ होतो जो पाचापासून निर्माण झाला आहे (पांच ज्ञानेंद्रिये) तेच मन याअर्थी घ्यावयाचे, व मन हे अहंकाराचे अधिष्ठान आहे. आपल्या शास्त्राचे मतानुसार आपल्यामधील अहंकार तत्व आपल्यातील आत्मस्वरूप नारायणाचे हातातील शंख आहे.
(९९) नंदकी :  - भगवंताचे हातातील तलवारीचे नांव आहे नंदक. म्हणून या संज्ञेचा अर्थ होतो जो नंदक तलवार धारण करतो व ती चालवितो तो नंदकी. तसेच नंदक म्हणजे आनंद निर्माण करणारा. शास्त्रानुसार भगवंताच्या पवित्र हातातील दिव्य हे स्र म्हणजेच विद्या होय. ज्याच्यामुळे भक्त आपल्या अंतःकरणातील आत्मस्वरूपाचे अज्ञान नष्ट करतो.
(९९) चक्री :  - जो सुदर्शन नावाचे चक्र धारण करतो तो. सु-दर्शन म्हणजे जो दिव्य दृष्टि देतो तो. शास्त्राचे मतानुसार हे चक्र मनुष्याच्या मनाचे प्रतिक आहे.
(९९) शारङ्ग्धन्वा :  - जो आपल्या शारंग नावाच्या अमोघ धनुष्याने अचूक लक्षभेद करतो तो. आपल्या शास्त्रानुसार श्रीनारायणाचे हे धनुष्य अहंकाराचे प्रतिक मानले आहे. व अहंकार तत्व हे सर्व ज्ञानेंद्रियांचे शिखर आहे. या शेवटच्या श्लोकामध्ये श्रीनारायणाच्या हातातील सर्व आशिर्वादात्मक साधनांचे भक्ती व आदरानें स्मरण केले आहे.
(९९) गदाधरः :  - ज्याने हातामध्ये कौमोदकी नावाची सुप्रसिद्ध दा धारण केली आहे तो गदाधर. ही गदा आनंद व सौंदर्य पसरविते. गदा मनुष्यातील बुद्धितत्वाचे प्रतीक आहे.
(९९) रथांगपाणीः :  - परंपरागत अर्थ आहे ज्याने रथाचे चाक हातामध्ये शस्त्राप्रमाणे धारण केले आहे तो. म्हणजेच या श्लोकामध्ये वर्णन केलेले चक्र. व तो चक्री होय. परंतु इतर कांही जण या संज्ञेचे दुसरेही विवेचन करतात. परंतु भक्तीकाव्यामध्ये पुनरूक्ती हा काही दोष होत नाही व ते अगदी नैसर्गिकच आहे.
(९९) अक्षोभ्यः :  - निंदाव्यंजक शद्बांनी किती निंदा केली अगर कुणीही कुठलेही अपमानकारक कृत्य कितीही वेळां केले तरी जो क्षुब्ध होत नाही असा. बाह्य जगतातील कुठल्याही घटनेने ज्याची अंतरीक शांनी व निरवता कधीच ढवळली जात नाही तो नित्यशांत अक्षोभ्य होय. या संज्ञेने भगवंताची अपार क्षमाशीलता चे मनुष्यावरील अगाध प्रेम, करुणा व दया सुचविली आहे.
(१०००) सर्वप्रहरणारयुधः :  - ज्याला युद्ध करण्याकरतां व प्रहार करण्याकरतां सर्व आयुधांची, शस्त्रांची उपलब्धता आहे असा. कुठलाही शत्रु त्याला आश्चर्यचकित करूं शकत नाही, म्हणून तो सर्व विजयी आहे. त्याचे जवळ कुठल्याही बलाढ्य शस्त्राला प्रतिकार करू शकेल असे समर्थ स्र उपलब्ध आहे म्हणून तोच नेहमी विजयी ठरतो.
'' श्री सर्वप्रहरणायुधः नमः इति''
श्रीकृष्णाय परब्रह्मणे नमः

डॉ. सौ. उषा गुणे.

06 January, 2012

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०६

श्लोक १०६
आत्मयोनिः स्वयंजातो वैखानः सामगायनः 
देवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः  ।।
(९८) आत्मयोनिः :  - जो स्वतःच स्वतःचे उपादान कारण आहे. जो स्वयंभू, मूलभूत कारण आहे असा श्रीनारायण.
(९८) स्वयंजातः :  - जो विश्वाचा स्वामी असल्यामुळे त्याला व्यक्त होण्याकरतां दुसरे कुठलेही निमित्तकारण आवश्यक नसते असा. या विविधतेच्या जगात प्रत्येक कार्याकरता तीन कारणांची आवश्यकता असते. घट निर्मितीमध्ये उपादान कारण माती, निमित्त कारण आहे चक्र व कर्ता आहे कुंभार. श्रीनारायणाच्या या निर्मिती विश्वामध्ये या तीनही कारणस्वरूपांत तोच व्यक्त झालेला असतो. जसे मनुष्यास पडणारे स्वप्न विषय, त्यातील विषय. व पहाणारा सर्व तोच असतो. [1]
(९८) वैखानः :  - जो पृथ्वीचे खनन करतो. अध्यात्मिक मूल्ये नष्ट करणार्‍या असूरी प्रवृत्तीच्या भयानक हिरण्याक्ष राक्षसाला मारण्याकरतां पृथ्वीची दृढ घनता आपल्या दातांनी खणून भगवंत पाताळात पोहोचले व त्याचे सूक्ष्मरूप ओळखून त्यांनी त्या राक्षसास नष्ट केले. त्याचप्रमाणे आत्मप्रकाश आपल्या आतपर्यंत (अंतरंगात) पोहोचला तर अहंकार नष्ट होईल व शरीर मन बुद्धिच्या दुष्ट आसक्तीतून आपली सुटका होईल.[2]
(९८) सामगायनः :  - जो स्वतः सामगायन करतो तो.
(९८) देवकीनन्दनः :  - कृष्णावतारामध्ये जो देवकीचे पोटी जन्मला तो. जन्मापासून देवकी त्याला केवळ दुरूनच पाहूं शकली. तो गोकुळांत असल्यानें त्याच्या बाललीला, क्रीडा लांबूनच अनुभवू शकली व त्यात तिने आनंद मानला म्हणूनच तो देवकीनन्दन.
(९९) स्रष्टा :  - जो सृष्टी उत्पत्ती करतो तो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही आपले कार्य करण्याकरतां लागणारी शक्ति व कौशल्य त्या परमात्म्या नारायणापासूनच प्राप्त करतो.
(९९) क्षितिशः :  - क्षिती म्हणजे पृथ्वी, तिचा स्वामी. श्रीनारायण हा भूमातेचा पति असल्याने तिचा रक्षणकर्ता, पालनकर्ता व पोषणकर्ता आहे. येर्थ क्षिती म्हणजे जड प्रकृती किवा माया असाही अर्थ होतो व तो नारायण लक्ष्मीपति होय.
(९९) पापनाशनः :  - ज्याचे ध्यान केले असता सर्व वासना पाप नष्ट होते असा. जेव्हा भक्त त्याच्या प्रेमामध्ये समर्पित होऊन आपली सर्व कर्तव्य कर्मे करतो तेंव्हा त्याच्या सर्व वासना नष्ट होऊन जातात. व नवीन निर्माणच होत नाहीत. वेदांमध्ये प्रतिपादन केलेल्या कर्मयोगाचे हेच मूलतत्व आहे. आत्मस्वरूप नारायणाचे ध्यान केले असतां सर्व पापे नाहीशी होतात व कायमची दूर केली जातात.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   हेच ९८, ९८ या संज्ञांनी सुचविले आहे.
[2]  अहं = जीव. हिरण्य = सोने. अक्ष = डोळा, दृष्टि. सोन्याचा डोळा (दृष्टि) असलेला म्हणजेच इंद्रियांकडून मिळणार्‍या विषसुखाकडेच ज्याची दृष्टि आहे असा. केवळ भगवंतच त्याचा पूर्ण नाश करू शकतात.

03 January, 2012

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०५

श्लोक १०५
यज्ञभृद्यज्ञकृत यज्ञी यज्ञभुग्यज्ञसाधनः 
यज्ञान्तकृद्यज्ञगुह्यन्नमन्नाद एवच  ।।
(९७) यज्ञभृत् :  - यज्ञाचे अनुशासन करणारा. जो स्वार्थरहित समर्पित भावनेने केलेली सेवारूप सत्कर्मे (यज्ञ) करण्यामध्ये आपल्याला मदत करतो व पूर्णतेला नेतो तो यज्ञभृत् श्री नारायणच होय.
(९७) यज्ञकृत् :  - यज्ञ करणारा. किवा दुसरा अर्थ यज्ञ नष्ट करणारा. यज्ञ म्हणजे स्वार्थरहित मनाने भगवंतावरील पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने व आनंदाने केलेली सेवारूप सत्कर्मे.[1] भगवंत स्वतः सर्व सृजनकर्म याच यज्ञभावनेने करत असतो. व याच यज्ञाचा शेवटही विलयरूपाने तोच घडवून आणतो. म्हणूनच तो 'यज्ञकृत्' आहे. या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल सज्जनांचा यज्ञ (सत्कर्मे) तो पूर्ण करतो व दुर्जनांचे कर्म नष्ट करतो म्हणून तो यज्ञकृत् आहे.
(९७) यज्ञी :  - सतत चालणार्‍या यज्ञांचा तो नित्य भोक्ता आहे असा. ज्याअर्थी सर्व यज्ञामध्ये सर्व क्रिया नारायण केंद्रित व नारायण समर्पित होतात त्याअस्र्थी तोच 'यज्ञी' आहे, यज्ञाचा भोक्ता आहे.
(९७) यज्ञभुक् :  - यज्ञाच्या अग्निमध्ये जे जे समर्पित केले जाते व ज्या ज्या देवतांना आदरांने व आनंदानें आवाहन केले जाते ते सर्व नारायणास जावून मिळते. कारण तोच सर्व देवतांचे रूप धारण करीत असल्याने त्याचे सर्व हविर्भाव नारायणासच समर्पित होतात.
(९८०) यज्ञसाधन :  - जो सर्व यज्ञ पूर्ण करतो तो. त्याच्याच कृपेने सर्व प्रामाणिक व अंतःकरणपूर्वक केलेली सत्कर्मे अत्यंत सुयश प्राप्त करतात.
(९८) यज्ञान्तकृत् :  - जो यज्ञाचे शेवटी केले जाणारे कर्म म्हणजेच पूर्णाहूती जो पूर्ण करतो तो यज्ञान्तकृत्. यज्ञाचे शेवटी पूर्णाहूती देतांनां श्रीनारायणासच अनन्यतेनें व श्रद्धेनें आवाहन केले जाते या पूर्णाहुतीखेरीज यज्ञाची समाप्ती होत नाही. म्हणून श्रीहरिच पूर्णाहुतीरूप होतो. जेव्हा सर्व कर्मे त्याच्या सर्व साधनांसहित पूर्णपणे यज्ञांत समर्पित केली जातात तेंव्हाच आत्मस्वरूप नारायणाच्या दिव्य सौंदर्याचा साक्षात्कार घडून येतो.
     कांही टीकाकार यज्ञान्त शद्बाचा पूर्णाहुती असा अर्थ करीत नाहीत. तर अन्त म्हणजे शेवटी मिळणारे फल. अर्थातच या संज्ञेचा त्यांनी दिलेला अर्थ होईल 'हरि समर्पित अशा निस्वार्थी, प्रेमळ सेवायुक्त कर्माचे फल देणारा तो परब्रह्मस्वरूप श्रीनारायण
(९८) यज्ञगुह्यम् :  - सर्य यज्ञामध्ये ज्या परमसत्याचा साक्षात्कार होतो तो आहे 'श्री नारायण'. देहकुंडामधील ज्ञानाग्नीमध्ये (जाणीवेमध्ये) सर्व विषय द्रव्यांचे हवन केल्यानंतर ज्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते तेच हे परमगुह्य होय. हा व्यष्टिमध्ये होणारा यज्ञ गीतेमध्ये 'ज्ञानयज्ञ' म्हणून संबोधिला आहे. वेदांमध्ये यालाच ब्रह्मयज्ञ म्हटले आहे.[2]
(९८) अन्नम् :  - जो स्वतः अन्नस्वरूप झाला आहे तो श्रीनारायण. इंद्रियांचे विषय हा इंद्रिंयाचा आहार होय. (अन्न) ही संज्ञा क्रियापद स्वरूप समजल्यास प्रलयाचेवेळी सर्व विश्वाला जो खाऊन टाकतो तो नारायण. आपण झोपलो असता जसे आपले विश्व आपल्यामध्ये लीन होते त्याप्रमाणे प्रलयाचे वेळी सर्व विश्व त्याचेमध्ये विलीन होते. ज्याचेमध्ये सर्व नामरूपात्मक विश्व बीजरूपाने स्थित होते तो परमआत्मा नारायण अन्नस्वरूप आहे.
(९८) अन्नादः :  - जो अन्न खातो तो. केवळ बाह्य विश्वच नारायण स्वरूप नाही तर त्याचा आनंद घेणारा उपभोक्ता अहं  हाही नारायणस्वरूपच आहे. आपल्यामधील अनुभव घेणारा, इंद्रियांचे माध्यमातून कार्य करणारा जीवात्मा हा सुद्धा आत्मस्वरूप आहे, म्हणून आत्मा हाच एकाच वेळी अन्नही (भोग्य) आहे व अन्नाद (भोक्ता ) ही आहे. आपले जागृतावस्थेतील मनच स्वप्नावस्थेचा अनुभव घेणारा भोक्ता आणि भोग्य होते तसाच तो ’अन्नाद’ आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अनेन प्रसविष्वध्वनेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ गेता ३.१० – सृष्टि उत्पत्तिचे सुरवातील प्रजापतीने (ब्रह्मा) यज्ञासह सर्व प्रजेची (मानवांची) उत्पत्ति केला. त्याने आदेश दिला याच (यज्ञाचे) सहाय्याने तुम्ही वृद्धि पावाल. हाच तुम्हाला कामधेनूप्रमाणे सर्व इष्टफल देवो.
[2]  वीनच उत्पन्न झालेल्या जिज्ञासारूपी अग्नीमध्ये आम्ही आमचे अज्ञान व निकृष्ट वासनारूपी द्रव्याचे हवन करून टाकतो त्यायोगे दिव्य अशा आत्मतेजाची प्राप्ती होते.