31 March, 2008

भगवद्‌गीता ७ वा अध्याय - व्याख्या

हे पार्थ ! पृथायाः कुंत्याः अपत्यं पुमान्‌ पार्थः तत्संबुद्धौ हे पार्थ ! हे कुंतीपुत्र ! त्वं योगं पूर्वोक्तं योगं युंजन्‌ सन्‌ युंजतीति युंजन्‌ मनःसमाधानं कुर्वन्‌ असंशयं न विद्यते संशयो यस्मिन्‌ कर्मणि यथा भवति तथा असंशयं गतसंदेह यथा स्यात्‌ तथा समग्रं विभूति बल ऐश्वर्यादि सहितं मां परमात्मानं यथा येन प्रकारेण ज्ञास्यसि ज्ञातुं एष्यसि तत्‌ मया वाच्यमानं श्रुणु । कथंभूतः त्वम्‌ । मयि अंतर्यामिणि आसक्तमनाः आसक्तं प्रेम्णा संलग्नं मनो यस्य सः । पुनः कथंभूतः त्वम्‌ । मदाश्रयः अहमेव आश्रयो यस्य सः मदाश्रयः ।। १ ।।

अहं अंतर्बहिः अंतः अंतर्यामी बहिः सारथिः ते तुभ्यं जिज्ञासवे सविज्ञानं विज्ञानेन अनुभवेन सहितं सविज्ञानं ज्ञानं ज्ञायते तत्‌ ज्ञानं साधनं इदं वक्ष्यमाणप्रकारेण अशेषतः साकल्येन वक्ष्यामि कथयिष्यामि । यत्‌ ज्ञानं नित्यचैतन्यरूपं ज्ञात्वा वेदांतजन्यमनोवृत्तिविषयीकृत्य इह विज्ञानानुभवे व्यवहारभूमौ भूयः पुनरपि अन्यत्‌ किंचिदपि ज्ञातव्यं ज्ञातुं योग्यं ज्ञातव्यं नावशिष्यते अवशिष्टं किंचित्‌ ज्ञातव्यं अस्ति इति कांक्षितं न भवति तन्मात्रज्ञानेनैव त्वं कृतार्थो भवुष्यसि ।। २ ।।


मनुष्यव्यतिरिक्तानां अनंतजीवानां श्रेयो ज्ञानमेव नास्ति । ज्ञानवतां मनुष्याणां ज्ञानमेव श्रेयः । अयं चिदानंदाभिप्रायः । मनुष्याणां शास्त्रीयज्ञानकर्मयोग्यानां सहस्रेषु मध्ये कश्चित्‌ एकः पुरुषः अनेकजन्मसुकृतसमासादित नित्यानित्यवस्तुविवेकः सन्‌ सिद्धये सत्त्वशुद्धिद्वारा ज्ञानोत्पत्तये यतति प्रयत्नं करोति । यततामपि यततं प्रयत्‍नं कुर्वंति ते यतंतः तेषां यततां ज्ञानाय यतमानानां सिद्धाणां प्रागर्जितसुकृतानां साधकानामपि मध्ये कश्चित्‌ एकः श्रवणमनननिदिध्यासन परिपाकांते मां ईश्वरं तत्त्वतः अभेदेन वेत्ति साक्षात्करोति ।। ३ ।।


पंचतन्मात्राणि अहंकारः महान्‌ अव्यक्तं इति अष्टौ प्रकृतयः संति । पंचमहाभूतानि पंच ज्ञानेंद्रियाणि पंच कर्मेंद्रियाणि उभयसाधारणं मनश्च इति षोडशविकाराः उच्यंते । एतानि चतुर्विंशति तत्त्वानि । तत्र भूमिः पृथिवी आपः उदकानि अनलः तेजः वायुःप्रसिद्धः खं आकाशः इमानि पंचमहाभूतानि । गंधरूपरसस्पर्शशब्दात्मिकानि पंचतन्मात्राणि लक्ष्यंते । बुद्धि अहंकार शब्दौ स्वार्थौ । मनःशब्देन अव्याकृतं लक्ष्यते । अथवा मनः शब्देन स्वकारणं अहंकारः लक्ष्यते । पंचतन्मात्रसन्निकर्षात्‌ । बुद्धिशब्दः अहंकारकारणे महत्तत्त्वे मुख्य वृत्तिरेव । अहंकारशब्देन सर्ववासनावासितं अविद्यात्मकं अव्यक्तं लक्ष्यते । इति उक्तप्रकारेण इयं अपरोक्षाः प्रकृतिः मायाख्या पारमेश्वरी शक्तिः अनिर्वचनीयस्वभावा त्रिगुणात्मिका अष्टधा भिन्ना अष्टभिः प्रकारैः भेदं आगता । अस्यां प्रकृत्यां सर्वोपि जडवर्गः अंतर्भवति ।। ४ ।।


हे महाबाहो ! इयं प्रागुक्ता अष्टधा प्रकृतिः सर्वा चेतनवर्गरूपा अपरा निकृष्टा जडत्वात्‌ चेत्यपरं संसाररूपबंधत्वात्‌ कथिता । इतः अस्याः इति इतः अस्याः अचेतनवर्गरूपायाः क्षेत्रलक्षणायाः प्रकृतेः अन्यां विलक्षणां जीवभूतां जडमपि जगत्‌ जीवयति चेतनं करोतीति जीवभूतां तां जीवभूतां चेतनात्मिकां क्षेत्रज्ञलक्षणां मे मम परां आत्मभूतां विशुद्धां प्रकृतिं त्वं विद्धि जानिहि । यया क्षेत्रज्ञलक्षणया जीवभूतया अंतः अनुप्रविष्टया प्रकृत्या इदं अचेतनजातं जगत्‌ गच्छतीति जगत्‌ नामरूपात्मकं रज्जुसर्पवत्‌ स्वरूपविवर्त्तरूपं धार्यते अविद्यमानमपि स्वसत्तास्फुरणतया सच्चिद्‌रूपवत्‌ प्रदर्श्यते । अष्टधायाः विवर्तभूतायाः प्रकृतेः सकाशात्‌ अहं विलक्षणः इति मत्वा जीवन्मुक्तो भवतीति भावः ।। ५ ।।


त्वं एतद्योनीनि एते परापरे प्रकृती योनी कारण्र येषां तानि एतद्योनीनि सर्वाणि चेतनाचेतनात्मकानि निखिलानि भूतानि कार्यकारणरूपाणि इति अनेन प्रकारेण उपधारय अविस्मरणेन मनसि बुद्ध्यस्व । अहं परमेश्वरः सर्वज्ञः अनंतशक्तिमायोपाधिः परमात्मा कृत्स्नस्य चराचरात्मकस्य जगतः गच्छतीति जगत्‌ तस्य जगतः आगमापायिरूपस्य प्रपंचस्य प्रभवः प्रभवति यस्मादिति प्रभवः कर्यकारणरूपः तथा प्रलयः प्रकर्षेण सर्वं लीयते यस्मिन्निति प्रलयः विनाशकारणं अस्मि । स्वप्नतुल्यस्येव प्रपंचस्य मायिकस्य अहमेव उपादानं चेत्यपरं द्रष्टा अस्मि इति शेषः ।। ६ ।।


हे धनंजय ! धनं आत्मधनं जयतीति धनंजयः तत्संबुद्धौ हे धनंजय ! मत्तः सर्वज्ञात्‌ सर्वशक्तेः सर्वकारणात्‌ निमित्तोपादानात्‌ परमात्मानः सकाशात्‌ अन्यत्‌ विलक्षणं वस्तुभूतं किंचिदपि परमाणुमात्रमपि परतरं अतिशयेन परं इति परतरं प्रशस्यतरं सर्वस्य जगतः सृष्टिसंहारयोः स्वतंत्रं कारणं नास्ति । स्व्प्नवत्‌ इदं सर्वं मायया दृश्यजातं मयि सर्वाधिष्ठाने सर्वकारणे परमात्मनि प्रोतं ग्रथितम्‌ । सूत्रे मणिगणाः । यथा सूत्राधारेण मणिगणाः वर्तते तथा इदं सर्वं मदाधारेण सद्‌रूपं भाति अथवा सूत्रे तैजसात्मनि हिरण्यगर्भे स्वप्नदृशि स्वप्नप्राप्तमणिगणा इव । कनके कुंडलादिवत्‌ इति योग्यो दृष्टांतः ।। ७ ।।


हे कौंतेय ! हे कुंतिपुत्र ! अप्सु उदकेषु अहं रसः अस्मि रसरूपे मयि अपः उदकानि प्रोताः ग्रथिताः उदकेषु अहं रसरूपः उपासकेन ध्येयः । शशिसूर्ययोः शशी च सूर्यश्च शशिसूर्यौ तयोः शशिसूर्ययोः निशाकरदिवाकरयोः प्रभा शीतोष्णप्रकाशिनी अहं अस्मि प्रभारूपे मयि शशिसूर्यौ प्रोतौ ग्रथितौ । सर्ववेदेषु सर्वे च ते वेदाश्च सर्ववेदाः तेषु प्रणवः ओंकारः अहं अस्मि प्रणवरूपे मयि सर्वे वेदाः प्रोताः । खे आकाशे शब्दः अहं अस्मि । शब्दरूपे मयि खः आकाशं प्रोतम्‌ । नृषु मनुजेषु पौरुषं पुरुषकारः उद्योगः अहं अस्मि । पुरुषकारोद्योगे मयि सर्वे मनुजाः प्रोताः ।। ८ ।।


किं च पृथिव्यां भूमौ पुण्यः सुरभिः अविकृतः गंधः पृथिवीमात्ररूपः अहं अस्मि । चेत्यपरम्‌ विभावसौ अग्नौ तेजः दहनपचन प्रकाशनादि सामर्थ्यं अहं अस्मि । चेत्यपरं सर्वभूतेषु सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि तेषु सर्वभूतेषु स्थावरजंगमेषु जीवनं प्राणधारणं आयुः अहं अस्मि । तपस्विषु प्रशस्तं तपो येषां ते तपस्विनः तेषु तपस्विषु वानप्रस्थादिषु तपः शितोष्णक्षुत्पिपासादि द्वंद्वसहनसामर्थ्यरूपं अहं अस्मि । तद्‌रूपे मयि तवस्विनः प्रोताः ।। ९ ।।

किंच हे पार्थ ! पृथायाः कुंत्याः अपत्यं पुमान्‌ पार्थः तत्संबुद्धौ हे पार्थ ! त्वं सर्वभूतानां सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि तेषां सर्वभूतानां स्थावरजंगमानां सनातनं नित्यं वीजांतरानपेक्षं वीजं सर्वबीजकारणं मां परमात्मानं विद्धि जानीहि । एकस्मिन्नेव मयि सर्वबीजे सर्वेषां प्रोतत्वमित्यर्थः । बुद्धिमतां बुद्धिविद्यते येषां ते बुद्धिमंतः तेषां बुद्धिः तत्त्वातत्त्वविवेकसामर्थ्यं अहं अस्मि । बुद्धिरूपे मयि बुद्धिमंतः प्रोताः ग्रथिताः । तया तेजस्विनां प्रशस्तं तेजो येषां ते तेजस्विनः तेषां तेजस्विनां प्रभावातिशयानां तेजः प्रभावातिशयः अहं अस्मि । तेजोरूपे मयि तेजस्विनः प्रोताः ।। १० ।।

किंच हे भरतर्षभ ! हे भरतश्रेष्ठ ! बलवतां बलं विद्यते येषां ते बलवंतः तेषां बलवतां सात्त्विकधर्मानुष्ठान सामर्थ्यवतां बलं सात्त्विकधर्मानुष्ठान सामर्थ्यं अहं अस्मि । कथंभूतं बलम्‌ । कामरागविवर्जितं कामः प्राप्तेषु अभिलाषः रागः प्राप्तेष्वपि भूयः अधिकसंपादनार्थं तृष्णा कामरागौ कामरागाभ्यां विवर्जितं रहितं कामरागविवर्जितं चेत्यपरं भूतेषु चतुरः वर्णान्‌ अभिलक्ष्य जातेषु धर्माविरुद्धः धर्मेण अविरुद्धः धर्माविरुद्धः स्वदारेषु पुत्रोत्पत्तिहेतुमात्रेण उपयोगी कामः विषयः अहं अस्मि । सर्व मयि प्रोतम्‌ ।। ११ ।।


किंच ये अन्य सात्विकाःशमदमादयः चेत्यपरं ये प्रसिद्धाः राजसाः रजसः रजोगुणस्य इमे राजसाः कामलोभादयः चेत्यपरं तामसाः तमसः तमोगुणस्य इमे तामसाः क्रोधमोहादयः भावाः अवस्थाविशेषाः प्राणिनां स्वकर्मवशात्‌ जायंते उत्पन्नाः भवंति । त्वं मत्तः एव अधिष्ठानभूतादेव जायमानान्‌ तान्‌ सात्त्विकादिभावान्‌ विद्धि जानीहि । तेषु सात्विकादिभावेषु अहं न वर्त्ते जीववत्‌ तदधीनो न भवामि । ते तु सात्त्विकादिभावास्तु मदधीनाः संतः मयि परमेश्वरे वर्तंते ।। १२ ।।

एभिः इदानीं उक्तैः त्रिभिः त्रिविधैः भावैः शमदम कामलोभक्रोधमोहादिभिः सर्वं संपूर्णं इदं प्रत्यक्षं जगत्‌ जंगमधर्मं ब्राहमणादिरूपं मोहितं सत्‌ स्वरूपं विस्मार्य अन्यथात्वं नीतं सत्‌ मां स्वात्मभूतं सर्वतः वर्तमानं नाभिजानाति स्वात्मानं न पश्यति । कथंभूतं माम्‌ । एभ्यः भावेभ्यः परं एभिर्भावैः अस्पृष्टं एतेषां भावानां नियंतारं अत एव अव्ययं न विद्यते व्ययो नाशः यस्य तत्‌ अव्ययं निर्विकारम्‌ । कथंभूतं भावैः । गुणमयैः गुणप्रचुराः गुणमयाः तैः गुणमयैः सत्त्वरजस्तमोगुणविकारैः ।। १३ ।।

दैवी देवस्य इयं दैवी देवस्य द्योतनात्मकस्य इयं एषा प्रत्यक्षा अन्यथा संतं आत्मानां अन्यथा प्रदर्शयंती मम विष्णोः माया मा यातीति माया मा निषेधं स्वरूपतिरस्कारं याति दर्शयतीति माया मदाश्रया त्रिभिः गुणमयैः भावैः सर्वं जगत्‌ मोहयति । हीति निश्चयेन । कथंभूता माया । गुणमयी गुणप्रचुरा गुणमयी सत्त्वादिगुणप्रचुरा । पुनः कथं भूता माया । दुरत्यया दुःखेन कष्टेन अत्येतुं अतिक्रमितुं अशक्या दुरत्यया । 'भगवदाश्रया माया ब्रह्मादिभिरपि अनतिक्रमणीया इति श्रुत्वा मादृशेन कथं कर्तव्यम्‌' इति व्याकुलितं अर्जुनं आलक्ष्य अवलोक्य सोपायं प्रोत्साहयति प्रकर्षेण उत्साहयति आनंदयति । मदीया माया ब्रह्मादीनामपि जेतुं अशक्या इति ज्ञात्वा तान्‌ विहाय ये अनेकजन्म सुकृतोपचयवंतः पुरुषाः मामेव सर्वांतर्यमिणं प्रपद्यंते भजंति आत्मत्वेन जानंति ते पुरुषाः एतां मदीयां मायां तरंति न तु अन्ये । अयं चिदानंदाभिप्रायः ।। १४ ।।

हे अर्जुन ! नराधमाः नरेषु मध्ये अधमाः नराधमाः इह लोके साधुभिः निंदिताः परत्र परलोके अनर्थसहस्रभाजः मां परमेश्वरं वासुदेवं न प्रपद्यंते न भजंति । 'अहो दौर्भाग्यं तेषाम्‌' - इत्याभिप्रायः । कथंभूताः नराधमाः । दुष्कृतिनः दुष्टं कृतं कृत्यं येषामस्ति ते दुष्कृतिनः पापेन सह नित्ययोगिनः पापकर्माणः । पुनः कथंभूताः नराधमाः । मूढाः इदं अर्थसाधनं इदं अनर्थसाधनं इति विवेकशून्याः । पुनः कथंभूताः नराधमाः । मायया शरीरेंद्रियसंघाततादात्म्यभ्रांतिरूपेण परिणतया मायया अपहृतज्ञानाः अपहृतं प्रतिबद्धं ज्ञानं विवेकसामर्थ्यं येषां ते अपहृतज्ञानाः । पुनः कथंभूताः । आसुरं असुषु इंद्रियेषु रमंत इति असुरां असुराणां विषयपराणां अयं आसुरः तं आसुरं भावं हिंसानृतादिस्वभावं आश्रिताः आसमंतात्‌ आश्रित्य स्थिताः आश्रिताः प्राप्ताः ।। १५ ।।

हे अर्जुन ! चतुर्विधाः चत्वारः विधाः प्रकाराः येषां ते चतुर्विधाः प्रकारचतुष्टयोपेताः सुकृतिनः पूर्वजन्मकृत पुण्यसंचयाः जनाः सफलजन्मानः मां परमेश्वरं नारायणं वासुदेवं भजंते सेवंते । तेषां चतुर्णां मध्ये त्रयः सकामाः एकः निष्कामः इत्येवं चतुर्विधाः आर्तः आर्त्या शत्रु व्याध्याद्यापदाग्रस्तः आर्तः तन्निवृत्तिं इच्छन्‌ । यथा मखभंगेन कुपिते इंद्रे वर्षति सति व्रजवासिजनः । यथा जरासंधकारागारवर्ती राजनिचयः । यथा द्यूतसभायां वस्त्राकर्षणे द्रौपदी चेत्यपरं ग्राहग्रस्तो गजेंद्रः । तथा जिज्ञासुः ज्ञातुमिच्छतीति जिज्ञासुः मुमुक्षुः आत्मज्ञानार्थी । यथा मुचुकुंदः यथा मैथिलः जनकः चेत्यपरं श्रुतदेवः चेत्यपरं निवृत्ते प्रवृत्ते मौसले उद्धवः । तथा अर्थार्थी अर्थस्य भोगस्य अर्थो यस्यास्तीति अर्थार्थी इह लोक परत्र परलोके भोगोपकरणं लिप्सुः । यथा इहलोके सुग्रीवः चेत्यपरं बिभीषणः च उपमन्युः परत्र परलोके ध्रुवः एते त्रयोपि भगवद्‌भजनेन मायां तरंति । एते त्रयः सकामाः व्याख्याताः । इदानीं चतुर्थः ज्ञानी निष्कामः उच्यते । ज्ञानी ज्ञानेन भगवत्तत्त्वसाक्षात्कारेण नित्ययुक्तः तीर्णमायः निवृत्तसर्वकामः । हे भरतर्षभः ! त्वमपि जिज्ञासु वा ज्ञानी वा कतमः अहं भक्तः इति मा शंकीष्ठाः । निष्कामभक्तः ज्ञानी यथा सनकादिः च नारदः च प्रल्हादः च पृथुः च शुकः । शुद्धप्रेमभक्ताः यथा गोपिकादयः च अकृरः च युधिष्ठिरः । कंसशिशुपालादयः भयात्‌ द्वेषात्‌ भगवद्‌गतिं प्राप्ताः । अयं मधुसूदनाभिप्रायः ।। १६ ।।

तेषां चतुर्विधानां भक्तानां मध्ये ज्ञानी तत्त्वज्ञानवान्‌ निवृत्तसर्वकामः विशिष्यते विशिष्टो भवति । सर्वोत्कृष्ट इत्यर्थः । कथंभूतः ज्ञानी । नित्ययुक्तः नित्ये आत्मस्वरूपे युक्तः सक्तः नित्ययुक्तः सर्वदा अप्रच्युतात्मस्वरूपः । पुनः कथंभूतः ज्ञानी । एकभक्तिः एकस्मिन्‌ भगवति भक्तिः अनुरक्तिर्यस्य सः एकभक्तिः अथवा एका असाधारणा भक्तिः भजनं यस्य सः तथोक्तः । हि यस्मात्कारणात्‌ अहं ज्ञानिनः ज्ञानयुक्तस्य अत्यर्थं अतिशयेन प्रियः निरुपाधिप्रेमास्पदं अस्मि चेत्यपरं सः ज्ञानी मम सर्वात्मनः परमेश्वरस्य प्रियः आत्मा प्रियोतिशयेन भवति ।। १७ ।।

एते सर्व आर्तादयः त्रयः उदाराः मदुपासकत्वेन श्रेष्ठाः महांतः मोक्षभाजश्च सन्ति । पूर्वजन्मार्जित अनेकसुकृतराशित्वात्‌ । अन्यथा हि मां न भजेयुः । किं तु ज्ञानी तु आत्मैव अहमेव अस्मि । हि इति निश्चयेन मे मम मतं निश्चयः अस्ति । सः ज्ञानी युक्तात्मा सन्‌ युक्तः मयि स्थितः आत्मा चित्तं यस्य सः तथोक्तः सन्‌ मामेव सर्वात्मानमेव गतिं गम्यते प्राप्यते इति गतिः तां गतिं सर्वागमैः प्रतिपादितां आस्थितः आसमंतात्‌ मामेव अधिष्ठाय स्थितः मद्‌रूपेण अवस्थितः । कथंभूतां गतिम्‌ । अनुत्तमां न विद्यते उत्तमा यस्याः सा अनुत्तमा तां अनुत्तमां सर्वोत्तमाम्‌ । १८ ।।

यः कश्चित्‌ पुरुषः बहूनां असंख्यानां जन्मनां सर्गाणां किंचित्पुण्योपचयहेतूनां अंते चरमे जन्मनि सर्वसुकृतविपाकरूपे ज्ञानवान्‌ सन्‌ ज्ञानं विद्यते यस्य सः तथोक्तः सन्‌ मां सर्वात्मकं निरुपाधिसर्वास्पदं प्रपद्यते सर्वात्मभावेन भजति । कथंभूतः यः । सर्वं वासुदेवः इति ज्ञानवान्‌ । इदं सर्वं 'यदयमात्मा' इति श्रुतेः । यत्‌ किंचित्‌ दृश्यते श्रूयते तत्सर्वं वासुदेवः सर्वाणि भूतानि वसंति यस्मिन्‌ सः वसुः तानि भूतानि स्वसत्तास्फुरणेन द्योतयति प्रकाशयति इति देवः । यद्वा दीव्यतीति देवः दीव्यति स्वस्वव्यवहारयोग्यानि करोतीति देवः वसुश्चासौ देवश्च वसुदेवः वसुदेव एव वासुदेवः । यद्वा देवकार्यार्थं वसुदेवात्‌ देवकीपतेः आविर्भूतः वासुदेवः निर्विशेषं ब्रह्म इति एवं प्रकारेण ज्ञानवान्‌ ज्ञानं विद्यते यस्य सः अतः हेतोः सः एवं विज्ञानपूर्वक मद्‌भक्तिमान्‌ महात्मा महान्‌ अत्यंत शुद्ध आत्मा अंतःकरणं यस्य सः महात्मा जीवन्मुक्तः सर्वोत्कृष्टः तत्समः अन्यो नास्ति अधिकस्तु नास्त्येव अतः हेतोः सुदुर्लभः सुतरां मनुष्याणां सहस्रेषु दुःखेनापि कष्टेनापि लब्धुं प्राप्तुं अशक्यः सुदुर्लभं जनानां प्रत्यक्षगोचरः न भवति ।। १९ ।।

ये पुरुषाः तैः तैः प्रसिद्धैः इहामुत्रभोगविशेषैः कामैः काम्यंत इति कामाः तैः कामैः स्रक्चंदनवनिताभिलाषैः पुत्रकीर्तिशत्रुजयादिविषयैः हृतज्ञानाः संतः हृतं अपहृतं ज्ञानं अंतःकरणं येषां ते हृतज्ञानाः गतविवेकाः अन्यदेवताः अन्याश्च ताः देवताश्च अन्यदेवताः वासुदेवातिरिक्तेंद्रादिदेवान्‌ प्रपद्यन्ते अत्यदरेण इंद्रादीन्‌ देवान्‌ सेवंते । किं कृत्वा । तं तं तत्तद्देवताराधने प्रसिद्धं नियमं जपोपवास प्रदक्षिणा नमस्कारादिरूपं आस्थाय आश्रित्य अवलंब्येत्यर्थः । कथंभूताः ये । स्वया स्वकीयया प्रकृत्या असाधारणया पूर्वाभ्यासवासनया नियताः वशीकृताः । ते पुरुषाः कथं मां भजंतीति तात्पर्यम्‌ ।। २० ।।

तेषां मध्ये यः यः कामी क्षुद्र फलेप्सुः भक्तः भजकः यां यां प्रसिद्धां तत्तत्फलप्राप्त्यर्थं भजनीयां तनुं मूर्तिं देवतां श्रद्धया जन्मांतरवासनाबलप्रादुर्भूतया भक्त्या संयुक्तः सन्‌ अर्चितुं पूजयितुं इच्छति इच्छां करोति तस्य तस्य कामिनः भक्तस्य अहं अंतर्यामी तामेव तत्तद्देवताविषयामेव पुउर्ववासनावशात्‌ प्राप्तां भक्तिं अचलां न चला अचला तां अचलां स्थिरां श्रद्धां विदधामि करोमि । न तु मद्विषयां श्रद्धां तस्य तस्य करोमीत्यर्थः ।। २१ ।।

सः देवताभक्तः कामी तया मद्दत्तया श्रद्धया स्थिरया भक्त्या युक्तः सन्‌ संयुक्तः सन्‌ तस्याः देवतायाः आराधनं पूजनं ईहते करोति उपसर्गरहितः सन्‌ आराधयति चेत्यपरं ततः देवतायाः सकाशात्‌ कामान्‌ ईप्सितमनोरथान्‌ लभते प्राप्नोति । कथंभूतान्‌ कामान्‌ । मयैव सर्वज्ञेन सर्वकर्मफलदायिना तत्तद्देवतांतर्यामिणा विहितान्‌ तत्तत्फलविपाकसमये निर्मितान्‌ । पुनः कथंभूतान्‌ कामान्‌ । हितान्‌ मनःप्रियान्‌ इत्यर्थः ।। २२ ।।


तेषां देवतान्तरोपासकानां जनानां तत्तद्देवताराधनजं फलं तु अंतवत्‌ अंतः विनाशः विद्यते यस्य

तत्‌ अंतवत्‌ भवति । यथा मद्‌भक्तानां विवेकिनां अनंतं फलं भवति तथा तेषां न भवति । कथंभूतानां तेषाम्‌ । अल्पमेधसां अल्पे क्षुद्रे तुच्छे विनाशशीले फले मेधा बुद्धिः येषाः ते अप्लमेधसः तेषां अल्पमेधसां अल्पफलाभिलाषिणां देवयजः देवान्‌ इंद्रादीन्‌ यजंति ते देवयजः मदन्यदेवताराधनपराः देवान्‌ स्वर्गस्थान्‌ इंद्रादीन्‌ यांति स्वर्गं गत्वा देवैः दत्तान्‌ कर्मफलभोगान्‌ प्राप्नुवंति । मद्‌भक्ता अपि मामेव अधनं ईश्वरमेव भजंति ते मद्‌भक्ताः ममोपासकाः मां अक्षयं शश्वदेकरूपं यांति प्राप्नुवंति । मद्‌भक्तानां देत्यपरं अन्यदेवताभक्तानां महदंतरमिति भावः ।। २३ ।।

अप्लबुद्धयः अल्पा विवेकशून्याः बुद्धिर्येषां ते अल्पबुद्धयः दृश्याभिनिविष्टमतयः अव्यक्तं न व्यक्तः अव्यक्तः तं अव्यक्तं प्रपंचातीतं व्यक्तिरहितं सर्वकारणं मां परमेश्वरं सर्वांतर्यामिणं व्यक्तिं कार्यरूपतां आपन्नं मत्स्यकूर्मरामकृष्णाद्यवतारेण कंचित्‌ जीवं मन्यंते । कथंभूताः अल्पबुद्धयः । मम सर्वांर्यामिणः परं सर्वकारणरूपं भावं स्वरूपं अजानंतः जानंति ते जानंतः न जानंतः अजानंतः । कथंभूतं भावम्‌ । अव्ययं न विद्यते व्ययो नाशः हस्य सः अव्ययः तं अव्ययं नित्यम्‌ । पुनः कथंभूतं भावम्‌ । अनुत्तमं न विद्यते उत्तमं यस्मात्सः अनुत्तमः तं अनुत्तमं साक्षिचैतन्यः आविर्भावतिरोभावरहितम्‌ ।। २४ ।।

अहं सर्वाधिष्ठानभूतः परमात्मा सर्वस्य बहिर्दृष्टेः लोकस्य प्रकाशः स्वेन रूपेण प्रकटः न भवामि किं तु केषांचित्‌ भक्तानां प्रकटो भवामीत्यभिप्रायः । कथंभूतः अहम्‌ । योगमायासमावृतः योगस्य मम संकल्पस्य वशवर्तिनी माया योगमाया योगमायया अयं अभक्तः जनः मां स्वरूपेण न जानातु इति संकल्पानिविधायिन्या मायया समावृतः स्म्यक्‌ आवृतः अयं चतुर्विधभक्तलक्षणः लोकः मूढः सन्‌ विपरीतदृष्ट्या मां मनुषमेव मन्यते । कथंभूतं माम्‌ । अजं जन्ममरणशून्यम्‌ । पुनः कथंभूतम्‌ । अव्ययं नाशशून्यम्‌ कथंभूतः लोकः । योगमायासमावृतः योगय्स्य अघटितघटनापटोः मम परमेश्वरस्य माया योगमाया योगमायया समावृतः आच्छादितः अत एव योगमायामोहितत्वात्‌ अयं लोकः मूढः मूर्खः भूत्वा मां अजं अव्ययं स्वात्मभूतं न जानाति ।। २५ ।।

हे अर्जुन ! अहं चिदात्मा सर्वज्ञः समतीतानि अतिक्रांतानि चेत्यपरं वर्तमानानि विद्यमानानि चेत्यपरं भविष्याणि आगामिनि काले जनिष्यमाणानि एवं कालत्रयवर्तीनि भूतानि स्थावरजंगमानि सर्वाणि वेद जानामि । इत्यत्र संशयो नास्तीत्यर्थः । मन्मायया मोहितः कश्चन कोपि मां तु सर्वदर्शिनं तु मदनुग्रहभाजनं मद्भक्तं विना न वेद न जानाति । मन्मायामोहितत्वात्‌ । अतः हेतोः मत्तत्त्ववेदनाभादेव प्रायेण प्राणिनः मां न भजंते इत्याभिप्रायः ।। २६ ।।

हे भारत ! हे भरतवंशोद्‌भव ! सर्गे सृज्यत इति सर्गः तस्मिन्‌ सर्गे मातुः सकाशात्‌ स्थूलदेहोत्पत्तिरूपसर्गे सर्वभूतानि सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि सर्वे प्राणिनः तदानीमेव प्राप्तेन द्वंद्वमोहेन द्वंद्वयोः सुखदुःखयोः अथवा शीतोष्णयोः लाभालाभयोः मोहः अभिनिवेशः द्वंद्वमोहः तेन द्वंद्वमोहेन अहं सुखी अहं दुःखी इत्यादिविपर्यासेन सुखदुःखाद्यभिनिवेशेन संमोहं स्वात्मानं विस्मृत्य अन्यथा देहोहमित्यादिभावं यांति प्राप्नुवंति । कथंभूतेन द्वंद्वमोहेन । इच्छाद्वेषसमुत्थेन इच्छा च द्वेषश्च इच्छाद्वेषौ इच्छादेवेषाभ्यां अनुकूल प्रतिकूल विषयाभ्यां समुत्था समुत्पत्तिः यस्य सः इच्छाद्वेषसमुत्थः तेन इच्छाद्वेषसमुत्थेन । सर्वाणि भूतानि मातृतो जन्मावसरे गर्भजातं ज्ञानं विस्मृत्य अन्यथाभावजनकं मोहं यांतीति भावः । हे परंतप ! परं मोहरूपं शत्रुं तापयतीति परंतपः तत्संबुद्धौ हे परंतप ! सर्वज्ञः परमात्मा आशीर्वचनेन स्वाभिप्रेतज्ञाने अर्जुनं अधिकारिणं करोति इति गम्यते । अयं चिदानंदाभिप्रायः ।। २७ ।।

येषां तु इतरलोकविलक्षणानां तु पुण्यकर्मणां पुण्यरूपाणि कर्माणि येषां ते पुण्यकर्माणः तेषां पुण्यकर्मणां अनेकजन्मसु पुण्याचरणशीलानां मदुद्देशेन नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानवतां प्रसिद्धानां जनानां जननधर्मिणां सफलजन्मनां तैः तैः पुण्यकर्मभिः पापं ज्ञानप्रतिबंधकं पापं अंतगतं नाशं प्राप्तं । अस्तीति शेषः । ते पुण्यकर्माणः द्वंद्वमोहनिर्मुक्ताः संतः द्वंद्वयोः सुखदुःखयोः मोहं द्वंद्वमोहः द्वंद्वमोहेन रागद्वेषादि निबंधन विपर्यासेन निर्मुक्ताः रहिताः द्वंद्वमोहनिर्मुक्ताः मां परमात्मानं भजंते वासुदेवः सर्वमिति ज्ञात्वा सप्रेमज्ञानसंपत्तिं कुर्वंति । कथंभूताः ते । दृढव्रताः दृढं व्रतं नियमः येषां ते दृढव्रताः अचलसंकल्पाः ।। २८ ।।

ये पुण्यकर्मानुष्ठानेन शुद्धसत्त्वानुभवो भयलोकवितृष्णाः किं च संसारदुःखात्‌ निर्विण्णाः जरामरण मोक्षाय जन्म रातीति जरा यद्वा जायते ऽसौ जः जं जीवभावं रातीति जरा अथवा प्रसिद्धैव अस्तु मरणं विनाशः जन्म विना मरणं नास्तीति प्रसिद्धम्‌‌ । जरा च मरणं च जरामरणे जरामरणाभ्यां मोक्षः तत्संबंधराहित्यं जरामरणमोक्षः तस्मै जरामरणमोक्षाय तदर्थं मां परमात्मानं आश्रित्य सोहं इत्यंगीकृत्य यतंति परमात्मनः साक्षात्काराय प्रयत्‍नं कुर्वंति । मदर्पितानि फलाभिसंधिशून्यानि विहितानि कर्माणि कुर्वंतीति भावः । ते पुरुषाः क्रमेण शुद्धांतःकरणाः संतः तत्‌ जगत्कारणमायाधिष्ठानं ब्रह्म परं शुद्ध निर्गुणं तत्पदलक्ष्यं मां विदुः जानंति । तथा अध्यात्मं आत्मानं शरीरं अधिकृत्य प्रकाशमानं कृत्स्नं उपाध्यपरिच्छिन्नं त्वंपदलक्ष्यं विदुः । चेत्यपरं कर्म तदुभयवेदनसाधन गुरूपसदन श्रवणमननादि अखिलं निरवशेषं फलाव्यभिचारि असिपदं विदुः जानंति इत्यर्थः ।। २९ ।।

ये पुण्यकर्मानुष्ठानेन शुद्ध सत्त्वानुभवाः युक्तचेतसः संतः युक्तं मदेकनिष्ठं चेतो अंतःकरणं येषां ते युक्तचेतसः अनुलक्ष्येण उत्पन्नसाक्षात्काराः संतः साधिभूताधिदैवं अधिभूतं च अधिदैवं च अधिभूताधिदैवे अधिभूताधिदैवाभ्यां सह वर्त्तत इति साधिभूताधिदैवः तं चेत्यपरं साधियज्ञं अधियज्ञेन सह वर्त्तत इति साधियज्ञः तं साधियज्ञं अधिभूतादि शब्दानां अर्थं भगवानेव अंतराध्याये व्याख्यास्यति । मां परमात्मानं विदुः चिंतयंति जानंतीत्यर्थः । ते पुरुषाः युक्तचेतसः संतः सर्वदा मयि समाहितचेतसः संतः प्रयाणकाले प्राणोत्क्रमणकाले इंद्रियग्रामस्य अत्यंतव्यग्रतायामपि अयत्‍नेन एव मत्कृपया मां सर्वात्मानं विदुः जानंति । तेषां मृतिकालेपि मदाकारैव चित्तवृत्तिः पूर्वोपचितसंस्कारपाटवात्‌ भवति ।। तथा च ते मद्‍भक्तियोगात्‌ कृतार्था एवेति भावः ।। इति सप्तमोऽध्यायः ।।

30 March, 2008

सुकृतिनो vs दुष्कृतिनो - २


सुकृतिनो vs दुष्कृतिनो - २

सुकृतिनो कोण ? दुष्कृतिनो कोण ? ते असे काय करतात की भगवंतांनी त्यांना असे संबोधावे ? मला आधी वाटले की थोडीशी पार्श्वभूमि तयार करून मग सरळ विषयाला हात घालता येईल. पण ज्या विषयरूपी या जगताचा जीवात्म्यावर, मनुष्यावर इतका जबरदस्त पगडा आहे की त्या भ्रांतिरूप जगताला जीवाने मानलेले सत्यत्व चुकीचे आहे हे जाणून मूळ स्वरूप आत्मतत्त्व जाणणे हे महा दुष्करच होऊन बसले. भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे बाबा ह्या मायामय मिथ्या जगतामध्येंच फसलेल्यांपैकी हजारो लोकांमध्ये एखादाच आत्मतत्त्व जाणून घेण्यास सिद्ध (पात्र) होतो आणि त्या सिद्धांपैकीं देखील कोणी एखादाच आत्मतत्त्व जाणतो. करितां हे जगत मिथ्या कसे आहे ते पाहणे जरूरी आहे. - मनुष्यानां सहस्रेषु,  कश्चित् यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥
मागे आपण पाहिले की 'मृगजळ' ही एक जलाचा आभास निर्माण करणारी, भ्रांतीने 'तेथे जल आहे' असे दर्शवणारी एक 'वस्तू' आहे. वस्तू म्हणायचे कारण म्हणजे कोणत्याही वस्तूचे मुख्य दोन घटक, जे नाम व रूप, हे इथेही आहेत. आता ही सर्व चिकित्सा करून मृगजळ ही एक भ्रांतीने निर्माण झालेली वस्तू आहे हे मनुष्याला, त्याच्या level of consciousness ला (म्हणजे तीव्र, मंद, व्यवसायात्मिका, अव्यवासायात्मिका, व्यावहारिक इत्यादि बुद्धि नव्हे) त्यातील जलाचे असत्यत्व जाणता येते. पण तेच हरिणाला नाही समजत. consciousness म्हणजे जाणीवेचा स्तर उंचावतो तेव्हां त्याला प्रज्ञेचा प्रांत म्हणतात. प्रज्ञा जागृत झाल्यावर आणखी साधनेने मनुष्य 'तुरीया' अवस्थेत जातो असे म्हणतात. तुरीया अवस्थेत पोचलेल्या ज्ञानी पुरुषावर विषय व इंद्रिये यांचा कांहीच परिणाम होत नसल्यामुळे या जगतातील कोणतीही नाम रूपात्मक वस्तू त्याला सुखी वा दुःखी करू शकत नाही. मग प्रत्येक वस्तू आणि सर्व वस्तूंनी मिळून बनलेले हे जग त्याच्या दृष्टीने मिथ्याच.
मग तो स्वतःला, आपल्या शरीरालाही मिथ्याच समजतो का ? इथेच तर त्याच्या आणि सामान्य पुरुषाच्या दृष्टीमधे फरक आहे. शरीर उपाधीने इतरांना तो एक वेगळा 'मी' आहे असे वाटत असले तरी त्याच्या अंतःकरणात एक वेगळा 'मी' असत नाही. करण तोच हे सर्व जगत्‌ झालेला असतो. त्याचा द्वैत भावच नाहिसा झालेला असतो. मग इतर सर्व वस्तूंकडे तो केवळ साक्षीभावाने पहात असतो. 'द्वा सुपर्णा' (मुंडक उपनिषद) मधील साक्षीभावाने जगताकडे पहात बसलेला पक्षी तो हाच.
पण अशा पुरुषाला "आत्मज्ञान" झाले, तो "ज्ञानी" झाला म्हणजे नेमके काय झाले ? त्याने नेमकी काय कृति केली ? त्याला कशाचे 'ज्ञान' झाले ? त्यालाही नाही सांगता येत. कारण 'ज्ञान' म्हणजे काय हे सांगण्यासाठी उपलब्ध असलेले माध्यम म्हणजे शब्द, विचार, तर्क, जाणीव हे सर्वच त्याचे वर्णन करण्यास अपुरे आहेत. ते सर्वच हतबल होतात. मग ज्ञानीजनही विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय हे सांगून ह्यांपैकी जे नाही (नेति, नेति) ते ज्ञान असे श्रीज्ञानेश्वर महाराजांसारख्या ज्ञानी लोकांना देखील सांगावी लागते. कसे ? ते म्हणतात -

मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।
जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥
तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे ।
तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥
अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।
तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥
आतां अज्ञान अवघें हरपे । विज्ञान निःशेष करपे ।
आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाइजे ॥ ७ ॥

भगवंत सांगत असतांना अर्जुनही गोंधळून गेला, आपला गोंधळ उडणार ह्यात शंकाच नाही. आता हे अज्ञान, विज्ञान कुठून आले ? भगवंत म्हणतात "हे जगत्‌ म्हणजे त्रिगुणात्मक गुणधर्मांनी बनलेल्या अनेक वस्तूंचे store house आहे ना ? पण आत्मस्वरूप / परमात्मस्वरूप तर अद्वैत आहे. तरी त्याचे ठिकाणी विनाशी व जडरूप अशा अनेक प्रकारच्या विशेष (म्हणजे परमात्म्याहून भिन्न, वेगळे) पदार्थाचे ज्ञान होणे हेंच प्रपंचज्ञान. विज्ञान म्हणजे प्रपंचज्ञान. पण परमात्मरूप अद्वैतरूपी आहे, तर त्याहून भिन्न असा प्रपंचच कुठून असणार. म्हणजे प्रपंच भ्रांतीरूपच झाला ना ? आणि तरी त्याचे ठिकाणी तुम्हां लोकाना 'सत्यबुद्धि' आहे. ह्या भ्रांतिरूप प्रपंचाचे ठिकाणी सत्यबुद्धि असणे हेंच अज्ञान. अज्ञान, विज्ञान ओळख आणि विवेकाने ते काढून टाक. उरले ते 'ज्ञान'. " अर्जुन म्हणाला, " God you are Great, पण काही काही समजले नाही. आता शंकराचार्य एक उदाहरण देतात.
'तरंगफेनभ्रमबुदबुदादि सर्वं स्वरूपेण जलं यथा तथा । 
चिदेव देहादि अहं अनंतमेतत्‌ सर्वं चिदेवैकरसं विशुद्धम्‌ ॥** (विवेकचूडामणि - ३९१) 
**
The waves, the foam, the whirlpool and the bubbles etc. are all, in reality water. Similarly, the BMI, PFT and OET are all nothing but the essence of Consciousness [chit-ekarasam] The essence of consciousness is objectless consciousness. The world "Consciousness" can be used only with reference to objects. The essence of Consciousness is pure and uncontaminated by the BMI, PFT and OET. All these are only illumined by the light of Consciousness - तस्य भासा सर्वं इदं विभाति (मुंडक २.२.१०) - Vivekacudamani by Swami Chinmayananda.

BMI = Body Mind Intellect, PFT=Perceives, Feels, Thinks or Perceiver/Feeler/Thinker, OET= Objects, Emotions Thoughts - these terms were coined by Swami Chinmayananda and were frequently used by him in his discourses.

- जल ही वस्तू तरंग, फेस, बुडबुडा, मेघ, डबके, तलाव, नदी अशा अनेक प्रकारे आढळते. वेगवेगळ्या नाम रूपाने अभिव्यक्त झालेला त्यातील प्रत्येक अंश मूळ स्वरूप 'जल' ह्याहून अभिन्न असूनही त्या त्या प्रत्येक उपाधीला जलाहून वेगळे असे 'मी' व ’इतर सर्व’ असे भासणे हाच प्रपंच. तरंग, फेन, नदी ह्या प्रत्येकाचे आपापले विश्व (जगत्‌) असले तरी ते सर्व अद्वैत जलाच्या कारणापासून झालेले कार्यरूप अंशात्मेच होत. तेव्हां या प्रत्येक अंशात्म्याला आपल्या स्थायी भावाचे 'ज्ञान' होईल तेव्हां ते आपल्यातच सर्व आविष्कार पाहतील. म्हणजे आपला मूळ जलापासून निर्माण झालेला नामरूपात्मक विशेष भाव गळून जाईल, तेव्हां त्यांना जाणवेल की आपल्यातच निर्माण झालेले हे सर्व आविष्कार आहेत. पण त्यावेळी जलाहून भिन्न अशा 'स्वतंत्र' अस्तित्वाची जाण असेल का ? असली तरी आपल्या 'स्वतंत्र' अस्तित्वाची "ती" एक कल्पनाच होती, भ्रम होता, अज्ञान होते हेही कळेलच.
पण मग जे हे दिसते ते स्थूल सूक्ष्म जगत्‌ नाहीच का ? आहे ते ही आहे. पण अद्वैत परमेश्वरापासून भिन्न नव्हे. सृष्टीचा हा देखावा, हे स्थूल सूक्ष्म जगत्‌ हे परमेश्वराचे 'शरीर' आहे. माझ्या शरीरावरची त्वचा, नखे, ७२ कोटी नाड्या, हृदय, फुफ्फुस, हाडे हे सर्व मिळून 'मी' आहे. मग त्वचा, डोळा इत्यादि प्रत्येक अंशाने आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची कल्पना केली तर तो अंशात्मक जीवात्मा झाला. त्याच्या दृष्टीने पाहता त्यानेच मी वेगळा व हे सर्व वेगळे अशी कल्पना केल्याने त्याला सुख-दुःख होते. ह्या संपूर्ण शरीराचा स्वामी जो मी परमात्मा त्याला नाही. मग एखाद्या मासपेशीला "आत्मज्ञान" झाले तर ती शरीररूपी जगताशी एकरूप राहूनच ह्या शरीराच्या मालकाची सगुण भावाने भक्ति करीत सहस्रनामानें स्तुति करेल तेव्हां त्याच्या जगताला म्हणेल 'इदं शरीरम्‌' जसे ज्ञानी भक्त ह्या जगत्‌रूपी मालकाची विष्णुरूपाने सगुण भावना करून त्याची सहस्रनामाने स्तुति करताना त्याला पहिले नाम बहाल करतो " विश्वम्‌ "
आता दुष्कृतिनो, सुकृतिनो ह्यांचे काय झाले ? OK OK पुढच्या भागात आधी तेच.

एकोहम्‌

28 March, 2008

गुरु तेथे ज्ञान

गुरु तेथे ज्ञान
श्रीगुरुंची अनेकानेक रुपे-स्वरुपें पाहतां पाहतां श्रीगुरु अरुपातच विलीन होऊन राहतात. श्रीगुरु काय ? श्रीगुरु काय ? याची संकल्पना आठवू म्हटले तर शेवटी एवढेच जाणवते - "गुरु तेथे ज्ञान".
मूर्तिमंत आत्मस्वरूपातच गुरुंना पाहावे. ज्ञानाशी अगदी निकट संबंधीत म्हणून जरी श्रीगुरुच्या संदर्भात गणेश, शारदा यांची आठवण, रूपकें झाली, गुरुस्नेहभावावरून जरी आपण त्यांची मायमाऊलीशी तुलना केली, श्रीगुरुला अगदी चित्‌सूर्य म्हटले, तरी पण अखेरीस श्रीगुरुचे माहात्म्य वाचातीत आहे. आणि मग सरते शेवटी एकच तरणोपाय म्हणजे नतमस्तक होणे.
श्रीगुरु सामर्थ्याचे वर्णन करणे आपल्या शक्तिबाहेरचे काम. सूर्याला उटणे लावावे, कल्पवृक्ष टवटवीच्या फुलांनी शृंगारावा, कापराला अन्य सुगंधी द्रव्याने सुगंधीत करावे, चंदनाला लिंबाच्या खोडाची उटी लावावी, हे जसे, जितके हास्यापद आहे, तितकेच काय, पण त्याच्याहून जास्तच थट्टा म्हणजे श्रीगुरुचे शब्दांनी वर्णन करणे.
'विशदबोधविदग्धा', 'विद्यारविंदप्रबोधा', 'संसारतमसूर्या' अशी विशेषणे सुद्धा त्यांचे वर्णन करण्यास असमर्थच. पण ती त्यांच्या ज्ञानदायी सामर्थ्यावर प्रकाश टाकतात एवढे खरे.
श्रीगुरुच्या पाऊलापाशी काय पिकत नाही ? ज्ञानोबाराय एके ठिकाणी म्हणतात - 'पिके सारस्वत तुझिया पाऊली' ! 'पिके' हा शब्दच मुळी नवनिर्मितीसूचक आहे. 'पिकणे' ह्यात सृजनाची, सृजनात नवनिर्मितीची आणि नवनिर्मितीत चेतनाची (ब्रह्मचैतन्याची) गर्भित अशी आशय घनता आहे. आध्यात्म शास्त्रदृष्ट्या गुरु स्नेहाळ माऊलीप्रमाणे परिपुष्ट करणारे आहेतच, पण साधकाच्या सर्व स्तरावरील विकासात, उन्नतीत, सर्वोदयास हातभार लावणारे असतात.
प्रभावसंपन्न, प्रतिभासंपन्न, ऐश्वर्यसंपन्न गुरुमाऊलीच्या, श्रीमंत गुरु‍अंबापदाचे केवळ स्मरणच प्रभुत्व आणि राऱ्याच संपत्तीची निर्मिती अगदी सहज करत असते. स्मरणासरशीच लक्ष्मी-मोक्षलक्ष्मी पायाशी लोळण घेते असा आजवरचा अनुभव आहे.
केवळ आणि केवळ गुरुसामर्थ्यामुळेच प्रापंचिक आणि अध्यात्मिक - पारमार्थिक अशी सगळी उद्दिष्टे साध्य होत असतात असा आपला दृढ विश्वास असावा. एकाच वेळी आत्मज्ञानाची जिज्ञासा आणि प्रपंचाची लालसा तृप्त करण्याचा गुण श्रीगुरुच्या रुपाने अवतरलेला आहे. श्रीगुरुला व्यावहारिक पातळीवरून न पाहता आत्मसत्तेच्या स्तरावरून पाहावे. नाही का ? श्रीगुरु साधकाकडे व्यावहारीक सत्तेतून कधीच पाहात नसतात, तर आत्मभावाने पाहतात. साधक हा कायम साधकच न राहतां तो आपल्यासारखा "गुरु"स्वरूप व्हावा अशी ज्याची तळमळ तो खरा "श्रीगुरु". ही साधक परिपूर्ण व्हावा अशी तळमळ - कळकळ त्या श्रीगुरुच्या सगळ्या कृतीतून, उक्तीतून सारखी, अखंड निथळत असते. साधकांनी पण ही श्रीगुरुच्या अंतरीची आत्मीयता नको का जाणायला ? गुरुप्रेमाला व्यवहाराचा स्तर नाही. आहे तो निखळ - निरपेक्ष अध्यात्मिक प्रेमभाव.

अण्णा -

21 March, 2008

डोळ्या अंजन भेटे..

डोळ्या अंजन भेटे..

आपल्याला आत्मज्ञानाची प्रगाढ अशी इच्छा असावी. ज्ञाननिष्ठाही ज्वलंत असावी. त्यासाठी सारे अध्यात्मग्रंथ, वेदग्रंथ, संतग्रंथ अभ्यासावेत. परंतु ग्रंथ फक्त आपल्याला शब्दज्ञान देतात. केवळ शब्दाने "आत्मज्ञान" होऊ शकत नाही, तर आत्मज्ञानाला अनुभूतीची नितांत गरज असते.
अध्यात्माचा पाया, पाया नाहीतर इमारतच मुळी अनुभूतीवर अधिष्ठित आहे. हे अनुभविक ज्ञान केवळ संतांकडूनच, श्रीगुरुंकडून लाभत असते. म्हणून देव आणि 'श्रीगुरु' यांत 'श्रीगुरु' हे अंतीम शरण्य मानले आहे.
अगदी उपनिषद काळापासून गुरुसंस्था चालत चालत आलेली आहे. गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्यच आहे. ही आपल्या भारतीयांची धारणा आहे. बहुश्रुत, व्युत्पन्न, ज्ञानसंपन्न, आणि आत्मानुभवाने परिपक्व अशा श्रीगुरुंचे जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे.
अध्यात्मशास्त्रीय, स्वानुभूतिप्रधान ज्ञानपरंपरा देहधारी (पण देहबुद्धी नाही) अशा गुरुंनीच तेवत ठेवली आहे. सगळ्याच महात्म्यांनी ही परंपरा तर पाळलीच आहे, पण श्रीराम, श्रीकृष्ण अशा साक्षात परब्रह्माच्या अवतारांनी 'गुरु' ही संकल्पना अधिक तेजस्वी, भरदार आणि जास्त उज्ज्वल केली आहे. आपल्या श्रीज्ञानदेवांनी गुरुच्या रूपांत मूर्तिमंत 'ज्ञानच' उभे केले आहे.
श्रीमत निवृत्तिनाथ हे ज्ञानराजांचे गुरु तसेच ते त्यांचे वडील बंधूही होते. परंतु गुरु म्हणून वा वडील बंधू म्हणून, निवृत्तिनाथांचे बाह्य स्थूल वर्णन, माऊलीनी आपल्या ग्रंथात कुठेही केलेले नाही. अमूर्त अरूप अशा ज्ञानपुंजालाच ज्ञानराजानी गुरुस्वरुपात पाहिले आहे- वर्णन केले आहे. आपल्या स्वतःला होणाऱ्या अनुभवाच्या पातळीवरील ज्ञानालाच ते आपल्या अंतरंगात राहणाऱ्या गुरुरूपात अनुभवतात. ज्ञानरुपाने श्रीगुरुच आपल्या हृदयी राहतात अशी निष्ठा. म्हणूनच ते म्हणतात - "मज हृदयी सद्‌गुरु । जेणे तारिलो हा संसारपुरु । म्हणऊनि विशेषे अति आदरु । विवेकावरी ॥"
गुरुमुळे ज्ञानदृष्टी लाभते. "जैसे डोळ्यां अंजन भेटें । ते वेळी दृष्टीस फाटा फुटे । मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ॥". डोळ्यात विशिष्ट अंजन घातले की पायाळू माणसाला जमीनीतले निधान (गुप्तधन) दिसू लागते, त्याचप्रमाणे गुरुकृपादृष्टी लाभली की आपल्याच ठिकाणी असणारा ज्ञानाचा साठा, म्हणजेच भगवंत स्पष्ट अनुभवाला येतो.
झाडाच्या मुळाशी घातलेले पाणी शेंड्यापर्यंत पोंचते, आणि झाडाचे सारे लहान मोठे शाखापल्लव सारख्याच तन्मयतेने टवटवीत करून सोडते. त्याचप्रमाणे श्रीगुरुच्या कृपा सहवास संगती एकरूप समरसतेने सर्व प्रकारची अभिलाषिते पूर्ण होतात आणि सारे जीवनच आत्मचैतन्याने, आत्मानंदाने अंतर्बाह्य बहरून जाते.
गुरुच्या ठायी आत्मज्ञान असते. त्यामुळे आपल्याला आत्मतत्त्व दिसते, आणि आत्मदर्शनाने समाधान लाभते.
अण्णा -

18 March, 2008

सुकृतिनो vs दुष्कृतिनो

सुकृतिनो vs दुष्कृतिनो


भगवद्‍गीतेच्या ज्ञानविज्ञान नामक सातव्या अध्यायात जीवात्म्याला जगताचा प्रत्यय नाहीसा होऊन केवळ अद्वैत ब्रह्मस्वरूपाचा प्रत्यय यावा हा हेतूने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आधी ज्ञानरूप परमेश्वराचे निरूपण करतात. मग ज्ञानाने जगत्‌ ठरवावे आणि भगवंताच्या प्रेमभक्तिने जगताचा मिथ्या भासही नाहीसा करायचा असे सांगतात. जगत्‌ म्हणजे नाम व रूप असलेले सर्व काही. आधी मिथ्या म्हणजे काय ? हे दृष्यरूप जगत्‌ अस्तित्वातच नाही की काय ? तसे नव्हे. जगत्‌ अस्तित्वात नक्कीच आहे. मी ह्या संगणकावर टंकलेखन करतोय, मग संगणक खरा नाहीच, मिथ्या, भ्रांतीरूप, आभासमय आहे असे कसे म्हणायचे ? वसिष्ठांपासून सांप्रत काळातील सर्वच ऋषी व संत 'हे दृष्यमय जगतच काय आपला देहदेखील उपाधीरूपाने मिथ्याच आहे,' असे म्हणतात. अहो पण मला जेव्हा तहान लागते तेव्हा 'हे पाणी मिथ्या आहे, माझी तहान मिथ्या आहे, ज्या मन वा बुद्धीला ती तहान जाणवली ते मन-बुद्धि मिथ्याच आहेत' असे म्हणून गप्प राहता येते का ? मग मिथ्या म्हणजे नेमके काय हे कुणीच का स्पष्ट करून सांगत नाहीत ? मला 'जगत्‌ मिथ्या' चा जो अर्थ उमगला तो असा. जीवात्म्याचे सर्वच्या सर्व व्यवहार सतत सुख कसे मिळवावे (वा दुःख निवृत्ति), सतत म्हणजे नित्य आनंदस्थिति कशी साधायची ह्यासाठीच असतात. कोणत्याही व्यवहारात, कोणत्याही कृतीच्या मागे दुसरी कोणती प्रेरणा असूच शकत नाही. आणि ह्या दृश्य जगतात अशी कोणतीच वस्तु नाही की जिला शाश्वर वा नित्य म्हणता येईल. सर्व वस्तू परिवर्तनशील व नाशिवंत आहेत. देवांसहित सर्वच जीवांना ठराविक आयुमर्यादा आहे, यन्‌ मर्त्यं तन्‌ नष्टम्‌ असे नामरूपात्मक सर्वच दृश्याचे स्वरूप आहे. ज्यात जीवाला सुख वाटते अशा कोणत्याही वस्तू वा परिस्थितीमध्ये परीवर्तन झाले की सुखाच्या डीग्रीमध्ये फरक पडणारच. पण जगातील एकूणएक वस्तू परिवर्तनशील आहे, आणि त्याच्याशी 'संग' झाल्यामुळे वाटणारे सुख वा आनंद देखील टिकणारे नाही म्हणजे अनित्य व मर्यादितच झाले. मग नित्य, अमर्याद, चिरंतन, शाश्वत सुख - ज्याला आनंद म्हणता येईल - ते जे काही अनंत, अमर्याद, चिरंतन, शाश्वत अशा वस्तूशी 'संग' केल्यानेच मिळू शकेल. अशी जी कोणती वस्तू आहे तिला 'सत्‌' म्हणायचे. आणि गंमत म्हणजे हे 'सत्‌' नामरूपात्मक जगताचा भाग नाही. पण त्याच 'सत्‌'ला मनुष्यमात्राने परत एक नाम (रूप नव्हे) देऊन त्याला भगवंत म्हणून टाकले. आता 'मी नित्य आनंदस्वरूप असावे' अशा स्थितीच्या प्राप्तीच्या दृष्टीने पाहता ह्या नामरूपात्मक जगतात एक 'सत्‌' सोडून नित्य, अपरीवर्तनशील असे काहीच सापडत नसल्याने त्या जगतातील सर्व काही म्हणजे संपूर्ण जगतालाच आनंद मिळवलेल्या, ज्ञान प्राप्त झालेल्या संतांनी 'मिथ्या' म्हणून टाकले. तरीपण हे जग भासमय, भ्रांतीमय, मिथ्या कसे हा प्रश्न राहिलाच. ह्यासाठी शास्त्रग्रंथांतून, संत वाङ्‍मयातून बरेच वेळेला एकाच उदाहरणाचा उल्लेख सापडतो. ते म्हणजे 'मृगजळ'. पटल्यासारखे वाटते पण शंका काही फिटत नाही. आपणही मानतो, मृगजळ आभासमय आहे - ठीक आहे - पण त्यालाही नाम रूप आहे ना ? आपल्यालाही ते 'दिसते' आणि ते काहीतरी आहे हेही नाकारू शकत नाही. पण ते आपल्या उपयोगाचे नाही एवढे मात्र खास. त्या वस्तूचा सुख, आनंद सोडाच, पण कोणत्याही हेतूने वापर करता येत नाही. मग आपल्यासाठी ते मिथ्या, भ्रांती, आभास वगैरे वगैरे आहे. तद्‌वत तुरीया अवस्थेचा अनुभव घेतलेले सर्व ऋषी व संत यांच्या दृष्टीने आनंदप्राप्तीसाठी हे जगत्‌ मिथ्याच आहे. मग फरक कुठे झाला. फरक फक्त दोघांच्या अवस्थेत झाला, मृगजळाचा अनुभव हरिणही घेते व माणूसही घेतो. या दोघांच्या अवस्थेत जो फरक आहे तोच फरक मूढ पुरुष व ज्ञानी पुरुष (संत) यांच्यात असावा. ज्ञानी पुरुषाला आपल्या अज्ञानी बांधवाबद्दल कळकळ असते. दोघांची भाषा एक असल्यामुळे संत अज्ञानी पुरुषाला समजावया प्रयत्‍न करतो की, 'अरे हे सर्व मिथ्या, आभासमय आहे, त्याचा नाद सोड'. तशी कळकळ अज्ञानी पुरुषाला हरिणाबद्दल वाटत नाही, आणि वाटली तरी सांगता येत नाही. बरे हरिणाची भाषा अवगत झाली आणि 'मृगजळ मिथ्या आहे' असे सांगायचा प्रयत्‍न केला तरी ते हरिण ऐकणार थोडेच. ते म्हणणार - काय सांगता राव, मला ते थोड्याशा अंतरावर चक्क दिसते आहे आणि तुम्ही त्याला मिथ्या म्हणता - better mind your business. मीही संताला तेच म्हणतो. मला तहान लागलीय. आणि हे समोर दिसते ते पाणी (नामरूप असलेले जगत्‌) आणि माझी सुखाची तहान हे दोन्ही मिथ्या ? भल्या गृहस्था, जरा कींव कर, मला पाणी पिऊ दे, माझी तहान भागू दे. तूही असा भणंगासारखा भटकू नकोस, तूही पाणी पी आणि सुखी हो. संत म्हणतो - "आपण दोघे त्या पिंपळावर बसलेल्या दोन पक्ष्यांप्रमाणे आहोत - द्वा सुपर्णा सयुजा सखाया, समानं वृक्षं परिषस्वजाते | तयो अन्यः पिप्पलं स्वादु अत्ति, अनश्नन्‌ अन्यो अभिचाकशीति (मुण्डक ३.१.१.) - mark my word - पाणी आणि तहान (जगत्‌) दोन्ही मिथ्याच बरं. तिथे आनंद नाहीच. शिकशील हळूहळू."
अहो पण 'ज्ञानविज्ञान', गीतेचा ७ वा अध्याय, दुष्कृतीनो इ. चे काय झाले. पाहू नंतर. आधी तहान लागली आहे. थोडे पाणी पिऊन येतो.

एकोऽहम्‌ -

17 March, 2008

मानसमणिमाला (५)


मानसमणिमाला (५)


हिंदी : सुनिसमुझहि जन मुदित मन मज्जहिं अनुराग ॥
लहहिं चारि फल अछत तनु साधु समाज प्रयाग ॥ २ ॥ बालकाण्ड.
मराठी: परिसुनि समजति मुदित मन मज्जति अति अनुरागिं ॥
लाभचारि फल या तनूं साधुसमाज-प्रयागिं ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : साधुसमाजरूपी प्रयागांत, त्रिवेणी संगमात जे भक्त अत्यंत मुदित मनाने व प्रेमाने (साधुजनांच्या उपदेशाचे) अवगाहन करतील, श्रवण करून एकाग्र मनाने समजून घेतील, त्यांत खोल बुडी मारतील त्यांना याच तनुंमध्ये, याच जन्मी धर्म, अर्थ, काम व मोक्ष ही चारी फळे प्राप्त होतील.

या ठिकाणी संत तुलसीदासांनी साधुसमाजाला त्रिवेणीची म्हणजेच प्रयागाची उपमा दिली आहे. तीर्थक्षेत्र प्रयागांत गंगा, यमुना व गुप्त रुपाने असलेली सरस्वती अशा तीन नद्यांचा संगम आहे. तसेच साधु समाजरुपी प्रयागांत भक्तिरुपी गंगा, कर्मविचाररुपी यमुना व ब्रह्मविचाररुपी सरस्वती यांचा संगम झालेला असतो. संतसज्जन आपल्या आचरणाने, कर्मयोगाने (ईश्वरार्पणबुद्धीनें केलेले निष्काम कर्म) ब्रह्मविचाराच्या सूक्ष्म सतत अनुसंधानाने (ज्ञानयोगाने) व या दोन्ही प्रवाहांना आपल्यात समाविष्ट करणार्‍या भक्तियोगानें समाजापुढे एक महान आदर्श ठेवत असतात.
सामान्य माणसांचा प्रायः अर्थ व काम या पुरुषार्थाची प्राप्ति करावी असाच कल असतो। त्याची जीवनांत आवश्यकता असतेच, पण त्यांची दिशा व मर्यादा माणसाला माहित असणेआवश्यक असते. ही दिशा आहे धर्माने दाखविलेली ! पण त्याचेही ज्ञान हवेच. हीच आहे ब्रह्मविचाररुपी सरस्वती ! सर्वांत अंतर्भूत असूनही न दिसणारी ! हा ब्रह्मविचार केवल मोक्ष पुरुषार्थाचीच दिशा दखविणारा आहे असे अनेकांना वाटते, त्यामुळे सामान्य माणसे त्याच्या वाटेलाच जात नाहीत. परंतु भक्तिगंगेने जसे कर्मयोगाला, यमुनेला आपल्यात समाविष्ट करून घेतले तसेच ज्ञानसरिता सरस्वतीलाही घेतले आहे. म्हणून संत असतात कर्मयोगी ज्ञानीभक्त. जगाच्या कल्याणाकरितां या संताच्या विभूति अर्थ कामाच्याच मागे लागलेल्या सामान्य माणसांना त्यांचे खरे स्वहित साधण्याकरितां या प्रयागांत अवगाहन करण्याचे आवाहन करतात. संतांचे स्वतःचेच जीवन एक विशाल त्रिवेणी संगम प्रयाग असतो. त्यांच्या चरित्राचे ज्ञान करून घेणे (श्रवण-सुनि) खोल मनन करणे (समुझहि) त्यांत बुडी मारणे (मज्जहि) आपल्या जीवनाशी पडताळून पाहणे, या सर्व प्रक्रियांमधून सामान्य माणसाला आपल्या खर्‍या स्वहिताचा मार्ग निश्चित सापडतोच. श्रवण-मनन-निदिध्यास ही भक्ति ज्ञानाचीच प्रक्रिया गोस्वामीजी आपल्याल येथे सुचवित आहेत. त्याच्यामुळे लौकिकातले पुरुषार्थ तर साधतां येतीलच पण श्रद्धेने प्रेमाने संतांचे अनुगमन केल्यास संतांच्य अनुभवास येणारे निजसुख आपल्यालाही प्राप्त झाल्याशिवाय कसे राहील ?

डॉ. सौ. उषा गुणे.

09 March, 2008

संतांची कळकळ - २

संतांची कळकळ -


संतांच्या अवताराचा हेतु एकच, "जगत उद्धार, जगत्‌कल्याण". घोर कलियुगात जड जीवांच्या उद्धाराची सर्वात जास्त कळकळ असणारे समर्थ महान पुरुष म्हणजे केवळ संतच.
देवाच्या अवताराच्या - अवतारकार्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, व संतांच्या कार्याच्या वेगळ्या. ईश्वर अवतारात "विनाशायच दुष्कृताम " नृहसिंह अवतार फक्त प्रल्हादापुरता करुण, बाकी कठोर. परशुराम अवतार - कृपा कमी, कठोर शासनच जास्त. बुद्ध अवतारात शासन कमीच, दया व अहिंसाच जास्त. थोड्क्यांत काय संतांचे अवतार देवापेक्षाही जास्त करुणामय आहेत एवढे मात्र खरे.
भगवंतांनी अवतार घेऊन दुष्टांचा वध केला, आणि संतांनी मात्र दुर्जनांना सज्जन केले. नृसिंहानी हिरण्यकश्यपूला मारला, रामानी रावणाला मारला, श्रीकृष्णानी कंसाला मारला पण आपल्या भगवताचार्य नारदांनी वाल्या कोळ्याला वाल्मीकी ऋषी केले. ज्ञानोबाराय पसायदानांत मागतात "जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ॥" जगत कल्याणाच्या बाबतीत सर्वच संतांची कळकळ सारखीच. " बुडता हे जन न देखो डोळा । थेतो कळवळा म्हणोनिया ॥ "
संत हे स्वतः पूर्णच असतात. जगत कल्याणासाठी आपले ज्ञान, अनुभव, बोध, उदार अंतःकरणाने, करुणेने जगताला वाटत राहतात. ह्या कृपाभावामुळे, कळकळीने कधी देवाजवळ, जनसामान्यांसाठी दान मागतात. "तुका म्हणे दान । द्यावे जी अनन्य ॥". प्रसंगी कडक भाषेतपण जगाला चांगले फैलावर घेतात. "मातेच्या पोटे दगड आला पोटासी", कधी कळवळून सांगतात, "ऐके रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥". 'रे' हा शब्द अत्यंत कृपावाचक आहे, कळवळ्यापोटी आहे. प्रसंगी याच करुणेने जगत कल्याणाच्या हेतूने समाजाच्या पाया पडतात. "सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥".
"मी वासुदेव तत्त्वता", "तुका विष्णु नाही दुजा" एवढ्या अधिकाराचे तुकोबाराय पण आपल्या पायी लागतात - "लागोनिया पाया विनवितो तुम्हाला । करे टाळी, बोला मुखी नाम ।". समोरचा कितीही हीनदीन असला तरी आपला मोठेपणा बाजूला सारून त्याच्या उद्धारासाठी त्याच्या पायी विनवणी करतात. अजून कळकळ ती काय असावी ? अजून उपकार तो काय असावा ?
म्हणून तर तुकोबारायांनी ज्ञानराजाला माऊलीची उपमा दिली. "लेकुराचे हित । वाहे माऊलीचे चित्त । ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रिती ॥". कळवळ्याच्या बाबतीत आई व संत एकाच जातीचे. पण "करी लाभावीण प्रिती" या बाबतीत संतप्रेमाची विशेषता आहे. व्यवहारी माता मुलावर प्रेम करते. मुलाला लहानाचा मोठा करताना, सांभाळताना हेतू नसतो. पण पुढे मुलगा मोठा झाल्यावर त्याने आपल्याला सांभाळावे ही आशा असते. म्हणजेच त्या प्रेमभावाला हेतूचा डाग लागतोच. म्हणून संतांच्या प्रेमभावाला व्यवहारी मातेची उपमा तोकडीच आहे.
केवळ उपकाराकरतांच ते या भूतलावर येतात, आपल्यात मिसळतात, आचरण करून, प्रसंगी बोटाशी (आणि कधी पोटाशीसुद्धां) धरून आपल्याला चालवतात। असे संत, आनंदाचे अनुकार, सुखाचे सागर, भक्तिप्रेमाचे माजघर असतात.
अण्णा -

05 March, 2008

मानसमणिमाला (४)

मानसमणिमाला (४)
हिंदी : साधु चरित सुभचरित कपासू ।
निरस बिसद गुनमय फल जासू ॥ ५ ॥
सोल सहि दुख परछिद्र दुरावा ।
वंदनीय जेहिं जग जसु पावा ॥ ६ ॥
मराठी : साधु-चरित शुभ चरित कपासी ।
निरस विशद गुणमय फल ज्यासी ॥
दुःख सहुनि परछिद्रं झांकति ।
जेणे जगति वंद्य यश पावति ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : ज्याचे फळ निरस असले तरी, शुभ्र उज्ज्वल व गुणमय असते अशा कापसाच्या चरित्राप्रमाणेच साधूंचेही चरित्र शुभ्र गुणमय असते. दोघेही स्वतः दुःख सहन करून दुसर्‍यांची दुखेः (छिद्रे) झाकतात त्यामुळे ते जगांत वंदनीय होतात व उज्ज्वल यश प्राप्त करतात.
कपाशीचे तीन भागांनी झालेले बोंड (फळ) स्वतः अत्यंत निरस असते. इतर फळांप्रमाणे त्याच्यात अजिबात रस नसतो. परंतु त्याच बोंडापासून निघणारा कापूस अनेक गुणांनी युक्त असून माणसाला अनेक तर्‍हेने उपयोगी पडतो. बोंडातील कापूस या अवस्थेपासून प्रत्यक्ष वस्त्राच्या स्वरुपांत जाईपर्यंत त्याला अनेक प्रक्रियांमधून जावे लागते. सालपटे कचरा काढण्याकरितां पिंजणे, पेळू तयार करण्याकरतां पिळणे, धागा तयार करण्याकरतां ताणणे, गुंडाळणे, वस्त्र तयार करण्याकरतां मागाच्या ताणा-वाण्यावर ताणून बसविणे व आडवे उभे धागे गुंफुन घेणे व त्यानंतर रंगविणे, छापणे इत्यादि क्रिया त्याच्यावर कराव्या लागतात तेव्हां आपल्याला सुंदर वस्त्र मिळते. शुभ्र कापूस हे सर्व कष्ट सहन करतो ते केवळ मानवाच्या शरीराचे थंडीवार्‍यापासून रक्षण व्हावे व लज्जारक्षण व्हावे म्हणून ! स्वतः अनेक कष्टदायक अवस्थांतून जावूनही तो माणसाचे दुःख निवारण करतो अ जगामध्ये अत्यंत आदराचे स्थान मिळवितो.
संत सज्जनही आपली उन्नती साधताना अनेक दुःखे सहन करतात। साधना करताना शारिरीक मानसिक कष्ट, स्वजनांचा विरह अगर संताप, इतरेजनांची निंदा नालस्ती, दारिद्र्य सारखी संकटे व कित्येक वेळां आपले ध्येय परमेश्वर प्राप्ती त्याच्याबद्दलची मनातून वाटणारी अनिश्चितता, निराशा यामुळे सज्जनांचे लौकिकातले जीवन कष्टमयच असते. त्यांना लौकिक जीवनांतून काही फायदा तोटा मिळवायचा नसतो, ना धनमानाची अतिरिक्त हांव, ना कीर्तिसाठी धावाधाव. आपले कर्तव्य निरपेक्षतेने व निष्ठेने पार पाडायचे या विचरावर ते स्थिर असतात. त्यामुळे इतरांना असे जीवन अगदीच निरस, रुक्ष वाटण्याची शक्यता असते. परंतु सज्जनांच्या अंतःकरणांत त्याच्याबद्दल कुठलीच तक्रार, प्रतिक्रिया नसते. आपल्या शुद्ध आचरणानें व गुणसंपदेनें परहित साधणे, पीडितांचे दुःख निवारण करणे हेच त्यांच्या जीवनाचे लौकिकातले कार्य असते. त्यातूनच त्यांना भगवंताची सेवा करावयाची असते. त्यामुळे इतरांचे दोष दाखविणे, परनिंदा, मत्सर या गोष्टी ते कटाक्षाने टाळतात. या उलट त्यांचे दोष झाकून किंवा दुरुस्त करून त्यांना भविष्यांतील दुःखापासून वाचविण्याचाच ते प्रयत्‍न करतात. त्यामुळे ते जगात आदरणीय ठरतात व भगवंत त्यांच्या कार्याला यश देतो.

डॉ. सौ. उषा गुणे.