31 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०४

श्लोक १०४
मूर्भुवःस्वस्तरूस्तारः सविता प्रपितामहः ।
यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङगो यज्ञवाहनः  ।।
(९६) भूर्भुवस्वस्तरूः :  - भूः (जगत), भुवः (अंतरिक्ष), स्वः (स्वर्ग) या तीनही लोकांना व्यापून असलेल्या जीवन वृक्षामधील प्रत्यक्ष रस हा श्री विष्णुच आहे. भू, भुवः, स्वः या वैदिक नावांनी हे तीन लोक प्रसिद्ध आहेत. संस्कृतमध्ये ’लोक’ म्हणजे अनुभवक्षेत्र होय. त्यामुळे या तीन संज्ञांना व्याहृती असे म्हटले जाते. व्यक्तिगतरित्या त्यानी आपल्या जागृत स्वप्न सुषुप्ती या जाणिवेच्या अवस्थेतील अनुभव दाखविले जातात. व्याहृति हे मंत्रवर्ण आहेत. व त्याच्या सहाय्यानें परमात्मा स्वतः आहुति देऊन यज्ञ करीत आहे व त्यानेच या विश्वाचे पालन पोषण होत असते. या सुंदर रूपकाने आत्मस्वरूप 'श्रीनारायण' हाच दिव्य असा 'रस' असून तो जाणीवेच्या सर्व स्तरावरील सर्व अनुभवांमधून सर्ववेळी या तीनही लोक व्यापणार्‍या जीवनवृक्षामधून वहात असतो असे सुचविले आहे.
(९६) तारः :  - जो सर्वांना तारून नेतो तो. पूर्ण शरणागत होऊन अढळ श्रद्धेने व क्तीने जर आवाहन केले तर भक्तांना या संसार सागरातून तारून नेणारा एकमेव, सनातन नावाडी तोच आहे, तोच तारण आहे. ज्ञानपूर्वक, एकाग्र व भक्तियुक्त चित्तानें ध्यान केले असतां आपल्या प्रत्येकामधील जाणीव जागृत होऊन वरच्या स्तरावर पोहोचते व त्या स्थितीत नित्य पूर्णब्रह्माचा अनुभव येतो. तोच श्री नारायण.
(९६) सविता - सर्व लोकांना जन्म देणारा. तो विश्वाचा दी पिता आहे.
(९७०) प्रपितामहः :  - सर्व जीवांच्या पित्यांचाही पिता आहे असा. त्रिमूर्तीमधील विधाता, ब्रह्मदेव हा स्वतः त्या आत्मतत्वामधून निर्माण झाला. ब्रह्मदेवास आपल्या वाङ्‌ग्मयांत पितामह म्हटले आहे.
(९७) यज्ञः :  - ज्याचे यज्ञ हेच स्वरूप आहे असा. सर्व जगताचे कल्याणाकरतां व सर्व जीवांच्या सुखस्वास्थ्याकरतां अत्यंत शुद्ध अंतःकरणाने, पूर्ण समर्पित भावाने व सर्वांच्या सहकार्यानें केलेले कर्म म्हणजेच 'यज्ञ'होय. ज्या ज्या ठिकाणी असे स्वार्थरहित सर्वांच्या सहकार्याने कर्म केले जाते तेथे त्या जीवांच्या कर्मामधून यज्ञस्वरूप नारायणच प्रकट होतो.
(९७) यज्ञपतिः :  - सर्व यज्ञांचा स्वामी. सर्व निस्वार्थी व एकोप्यानें केलेल्या कर्मांचा (यज्ञांचा) मी भोक्ता आहे हे भगवंताचे आनंदोद्गार आहेत. तसेच ते म्हणतात सर्व यज्ञांचा भोक्ता व प्रभूही मीच आहे. [1]
(९७) यज्वा :  - वेदांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे अत्यंत कसोशीने जो यजन करतो तो. आपल्या सर्व दिव्य कर्मामध्ये जो ही यज्ञभावना सदैव जागृत ठेवतो तो श्री नारायण यज्वा आहे. [2]
(९७) यज्ञाङगः :  - यज्ञामध्ये उपयोगांत आणली जाणारी साधने वस्तू हीच ज्याची अंगे आहेत असा. हरिवंशामध्ये वर्णन केल्याप्रमाणे यज्ञामधील वस्तु सर्व नारायणचीअंगे आहे.
(९७) यज्ञवाहनः :  - वेदांमधील आदेशांप्रमाणे जो पूर्णपणे विधी युक्त व बिनचूक यज्ञक्रिया करतो तो यज्ञवाहन होय. तोच नारायण होय.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   अहं हि सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच ॥ गीता ९.२४
[2]     ९७१ वी ’यज्ञ’ ही संज्ञा या संदर्भात पहावी. याच अर्थाने ’यज्ञ’ ही संज्ञा गीतेच्या ३ र्‍या अध्यायात वापरली गेली आहे.

28 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०३

श्लोक १०३
प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत्प्राणजीवनः 
तत्वं तत्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिगः  ।।
(९५) प्रमाणम् - जो स्वतः वेदस्वरूप आहे असा. वेद हेच त्या परमसत्याचे प्रमाण आहेत. किवा दुसर्‍या तर्‍हेने असे म्हणता येईल की जो शुद्ध चैतन्य स्वरूप (प्रज्ञानम्) आहे तो. श्रुतीमध्ये उल्लेखिल्याप्रमाणे "प्रज्ञानं ब्रह्म" म्हणजे प्रज्ञान हेच ब्रह्म आहे.
(९६०) प्राणनिलयः :  - ज्याचेमध्ये सर्व प्राण स्थित होतात असा. तोच सर्व प्राणीमात्रांच्या सर्व क्रियांचा मूलभूत चैतन्यदायी आधार आहे.
(९६) प्राणभृत् :  - सर्व प्राणांवर जो अधिशासन करतो तो. श्रीहरीच स्वतः प्रत्येक प्राणीमात्रास अन्न खाणे पचविणे, उत्साही वाटणे, क्रिया करणे व त्याची फलप्राप्ती करून घेणे, प्रौढ होणे, मरणे इत्यादी कर्मे करावयास लावतो. या सर्व कर्मामध्ये कर्माध्यक्ष दिव्यचैतन्य असा आत्मा श्री नारायण आहे. आत्मा पृथ्वीतलावरील सर्व प्राण्यामध्ये शांत व अलिप्त राहून त्यांच्या सर्व क्रिया स्वतःच्या अस्तित्वाने प्रवर्तित करतो व घडवून आणतो व चालू ठवतो.
(९६) प्राणजीवनः :  - सर्व प्राणीमात्रांस श्वासोच्छवासाचे द्वारा जीवंत ठेवतो तो प्राणजीवन. ही संज्ञा येथे तशी फारशी आनंददायक वाटत नाही कारण या आनंददायी अर्थाची संज्ञा या पूर्वीच येवून गेली आहे. अर्थात प्रेमामध्ये प्रेमिकानें आपल्या प्रेमास्पदास कितीवेळा त्याच त्याच नावानें हाक मारावी याला कांही नियम नाही !! परंतु आपण आणखी खोल विचार केल्यास जास्त नवा अर्थ सुचतो तो म्हणजे प्रत्येक श्वासालाही चैतन्याचा दिव्य स्पर्श करणारा तो 'प्राणजीवन' श्रीहरि होय.
(९६) तत्वम् :  - 'सत्य' - जे नित्य असून साररूप (तत्व) आहे. साक्षात्कारामध्ये ज्याचा अनुभव येतो ते तत्व आत्मा श्री नारायण आहे. [1]
(९६) तत्ववित् :  - ज्याला सत्यज्ञान पूर्णतः झाले आहे असा. म्हणजेच त्या आत्म्याचे स्वस्वरूपच होय. त्या आत्म्याचे ज्ञान झाले असतां ते जाणणारा आत्मस्वरूप होन जातो. [2] आत्मस्वरूप नारायणच ब्रह्मस्वरूप सत्य पूर्ण जाणतो कारण तेच त्याचे स्वरूप आहे.
(९६) एकात्मा :  - अद्वैत सत्य. एक आत्मस्वरूप नारायणच या विश्वातील चराचरातून जीवरूपाने अनंतरूपाने प्रकट होतो.
(९६) जन्ममृत्युजरातिगः :  - ज्याचेमध्ये कुठलाही बदल परिवर्तन होत नाही असा, जगातील प्रत्येक क्षणभंगुर वस्तू सतत बदलत असते व तो बदल अत्यंत दुःखदायक असतो. हे बदल म्हणजे जन्म, वर्धमान होणे, क्षीण होणे, विकार होणे, मृत्यु पावणे. ज्यास यातील कुठलाच बदल स्पर्श करूं शकत नाही असा आत्मस्वरूप नारायण अनंत शाश्वत सम व महान आहे. त्याचे स्वरूप स्पष्ट करताना गीतेने उद्‍घोषित केले आहे, 'जो जन्मरहित आहे, कधीही मृत होत नाही, व नेहमीच अस्तित्वात असलेल्या त्याचे अस्तित्व कधीच नष्ट होत नाही.[3]
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   तत् त्वं इति विज्ञानमेव तत्त्वम् ।
[2]   स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति - मुंडकोपनिषत् ३.२.९
[3]   न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ गीता २.२० – तो जन्मलेला नाही व कधीच मृत्यू पावत नाही, एकदा असल्यानंतर त्याचे नसणे कधीच संभवत नाही. तो अजन्मा, नित्य, विकाररहित व पुराण असून शरीर आहत झाले तरी मारला जात नाही.

25 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०२

श्लोक १०२
आधारनिलयोऽधाता पु्ष्पहासः प्रजागरः 
ऊर्ध्वगः सत्पथाचारः  प्राणदः प्रणवः पणः  ।।
(९५०) आधारनिलयः :  - जो मूलभूत आधार आहे असा. सर्व अस्तित्वाचा आधार. सर्व सजीवनिर्जीवास आधार आहे पृथ्वी व ही पृथ्वी त्या परमातम्याच्या आधाराने रहाते. व्यक्तिमध्ये अंतरात्म्याच्या आधारावरच मन आपले नामरूपात्मक जग उभारते.
(९५) अधाता :  - ज्याचेवर कोणी आज्ञाकारी अगर शासक नाही असा. कारण तोच सर्व श्रेष्ठ शासक आहे. तोच विधीही आहे. विधी व विधाता एकरूपच आहेत हे त्यातील चिरंतन सत्य आहे.
(९५) पुष्पहासः :  - जो उमलणार्‍या पुष्पांप्रमाणे प्रकाशित होतो असा. कळी उमलते व त्यातून पुष्प प्रकट होते परंतु पुष्प कळीमध्ये आधीही अप्रकट अवस्थेत असतेच. स्वतः परमात्मा महाप्रलयाचेवेळी अव्यक्त अवस्थेमध्ये असतो व वासनांची परिपूर्ती करण्याकरतां पुन्हा नामरूपजगताच्या रूपानें विकसित होतो म्हणून त्यास पुष्पहास अशी संज्ञा दिली आहे.
(९५) प्रजागरः :  - नित्य जागृत. ज्याला कधीच निद्रा येत नाही असा.निद्रा म्हणजे अज्ञान. सत्याबद्दलचे अज्ञान म्हणजेच अविद्या व या अविद्येमुळेच मी व माझे हे विपरीत ज्ञान निर्माण होते व त्यातूनच दुःख व संकटे निर्माण होतात. श्री नारायण स्वतः आत्माच असल्याने सतत जागृत असतो व आपल्या अनंत दिव्य स्वरूपांत भक्तांकरतां नित्य प्राप्त होवूं शकतो.
(९५) ऊर्ध्वगः जो नेहमी सर्वांचे वर शिखरावर स्थित असतो किवा जो नेहमी उर्ध्वदिशेने जातो तो. तो परमोच्च सत्य आहे व उत्क्रांतीचे शिखर आहे. जो सतत उत्तरोत्तर उर्ध्वदिशेने जातो तो ’ऊर्ध्वगः’. [1]
(९५) सत्पथाचारः :  - जो नेहमी सत्य मार्गाने चालतो तो. जो मार्ग आक्रमिला असतां सत्याची प्राप्ती होते तो [2]सत्पथ. तो निष्ठेने आचरण करणार्‍यांचेच इतरेजन अनुकरण करत असतात अशी भगवंत गीतेमध्ये सूचना देतात. भगवंत स्वतः पूर्णतेचे प्रतीक आहे भक्त त्यास आदर्श ठेन आपल्या आयुष्यात भगवंताचे निरपेक्ष प्रेम, चांगुलपणा व पूर्ण शांतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्‍न करतात.
(९५) प्राणदः :  - जो सर्वांना प्राणदान करतो तो. आपल्या शास्त्राप्रमाणे प्राण म्हणजे जीवनाची व्यक्त दशा दर्शविणार्‍या शारीरिक क्रिया व घडामोडी होत. आपली सर्व इंद्रिये, मन बुद्धि हे त्या आत्मस्वरूप नारायणाकडूनच शक्ति मिळवितात व त्यामुळेच शारीरिक संवेदना, मानसिक संस्कार व बुद्धिने ज्ञान मिळविण्याची क्रिया करूं शकतात. म्हणूनच त्याला 'प्राणद' म्हटले आहे
(९५) प्रणवः :  - प्रणव म्हणजे कार. वेदामध्ये पूर्णसत्य हे काराने दर्शविले जाते. परमसत्य प्रकट करणारा ध्वनी म्हणजेच कार. श्री नारायणास प्रणव म्हटलेले आहे कारण नारायणचे स्वरूपच कार आहे.[3]

(९५
) पणः :  - सर्व विश्वाचा सर्वश्रेष्ठ अधिकारी. पण ह्या धातूचा अर्थ होतो व्यवहार करणे तो सर्व कर्माचे योग्य बक्षिस देतो. प्रत्येक व्यक्तिला योग्य ते आदेश देतो. व त्याचेकडून योग्य ते कर्म करवितो. मानव व सुनिश्चत नियमांनी बद्ध झालेले विश्व यांच्यामधील क्रियांचे व्यवस्थापन व अधिक्षणही तोच करतो.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   ऊर्ध्वं गच्छति इति ऊर्ध्वगः ।
[2]      यद्यदाचति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन !
[3]       कार स्वरूपो हि नारायणः ।
  

22 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०१

श्लोक १०१
अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रूचिराङ्गदः 
जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः  ।।
(९४) अनादि:  - जो आद्यकारण आहे असा. व त्याला स्वतःला कुठलेही कारण नाही असा. श्री नारायण हा अनादि व अनंत आहे.
(९४) भूर्भुवः :  - जो भूमीचा प्रत्यक्ष आधार आहे असा. पृथ्वी नित्य अंतरिक्षात फिरत असते. आपण असे म्हणूं शकतो की जो स्वतःच पृथ्वीही आहे व ज्या अंतरिक्षामध्ये सर्व विश्व रहाते व आवर्तित होत असते तो आधारही श्री नारायणच आहे.
(९४) लक्ष्मीः :  - जो सर्व विश्वाचे वैभव, संपत्ती गौरव आहे असा. जर आत्माच नसता तर सर्व निश्चल, अजात व मृत राहिले असते. सर्व प्राणीमात्रांमधील जीवन व शुद्ध चैतन्य हे त्याचेच वैभव आहे.व हे क्रियाशील विश्व त्याचेमध्ये राहते व त्याचा उगमही तोच आहे. काही पाठभेदांत ९४ व ९४ या संज्ञा एकत्र केलेल्या आढळतात. त्या दोन्हींचा मिळून अर्थ होईल जो विश्वातील वैभव आहे व अंतरिक्षाचेही वैभव आहे असा श्रीहरी.
(९४) सुवीरः :  - ज्याला असंख्य गती आहेत व त्या सर्व अत्यंत दिव्य आणि गौरवशाली आहेत असा. त्याने आपल्या सर्व अवतारांतील आपल्या सर्व कृत्यांमधून व यशामधून आपला अतुलनीय भव्य पराक्रम प्रगट केला आहे.
(९४) रूचिराङ्गदः :  - जो अत्यंत तेजस्वी सुंदर भुजबंध धारण करतो असा. भुजबंध या नावाचा अलंकार पूर्वीचे काळी राजे महाराजे वापरत असत व त्यामुळे शत्रूंच्या तलवारीच्या आघातांपासून भुजांचे रक्षण होत असे.
(९४) जननः :  - जो सर्व प्राणीमात्रांस जन्म देतो असा. श्रीनारायण हा सर्वांचा महान् पिता आहे[1] कारण सर्व विश्व त्याचेच पासून जन्माला आले आहे. सर्व सृजनापूर्वी तोच होता, त्याचेपासूनच सर्व उत्पन्न झाले, त्याच्यामध्येच सर्वांना अस्तित्व आहे व त्याच्याच सामर्थ्यानें सर्वांचे भरण पोषण होत असते. अर्थात श्रीनारायणच जगत्पिता, जगदीश्वर आहे.
(९४) जनजन्मादिः :  - जो जगतातील सर्व जीवांच्या जन्माचे एकमेव मूलकारण आहे असा. वासना ह्या केवळ निमित्त कारण असतात. परंतु सत्य व अंतिम कारण आहे श्रीनारायण.
(९४) भीमः :  - ज्याचा आकार अत्यंत भव्य असल्यानें पापी लोकांच्या मनांत ज्याच्यामुळे भय निर्माण होते असा. 'हे तुझे हे अद्‍भुत ग्र रूप पाहून सर्व विश्व भयभित झाले आहे.' [2] असे भगवंताचे रूप पाहून अर्जुन घाबरून म्हणतो तसेच तो म्हणतो, महात्मन् तुझी ही अनंत भव्य रूपे पाहून सर्व विश्व व मीही अत्यंत भयभित झालो आहोत.[3] तुझे हे आकाशाला भिडणारे भव्यरूप पाहून माझे हृदय भीतीनें मृतवत झाले आहे. हे विष्णु, माझ्या मनाला धीर नाही की शांतीही नाही, असे वारंवार उद्गार भगवंताचे भव्य विश्वरूप पाहून अर्जुनाला काढावे लागले.
(९४) भीमपराक्रमः :  - ज्याचा पराक्रम दुर्दमनीय असून शत्रूंना भय निर्माण करतो तो.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   पुतासि लोकस्य चराचरस्य । या चर्-अचर जगताचा तू पिता आहेस.
[2]  द्दष्ट्वाद्‌भूतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ।
[3]  नभःस्पृशं दीप्तमनेक वर्णम व्यात्ताननम् दीप्त विशालनेत्रम् 

19 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १००

श्लोक १००
अनंतरूपोनन्त श्रीर्जितमन्युर्भयापहः 
चतुरस्त्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः  ।।
(९३) अनंतरूपः :  - ज्याची असंख्य रूपे आहेत असा, जगतातील वस्तूजाताचे असंख्य आकार व रूपे आहेत व हे त्याचेच प्रकटी करण आहे, तत्वतः ते दुसरे काहीच नसून प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. स्वप्नातील संपूर्ण वस्तूजाताचा विस्तार ज्याप्रमाणे एकाच जागृत व्यक्तिच्या मनाची निर्मिती असते, व जाणीवेच्या अर्धजागृत अवस्थेत (स्वप्नात) त्याचीच अनेकत्वाने प्रतीति येते त्याचप्रमाणे जेव्हा परमार्थ साधकास नारायण-भावामध्ये पुनर्जागृती येते येते त्यावेळी दृश्य, भावना व विचारांनी निर्मित झालेले जगत हे दुसरे कांही नसून त्या नारायणाचे स्वरूप आहे असे त्यास प्रतीत होते.
(९३) अनंतश्रीः :  - जो अनंत वैभवाने परिपूर्ण आहे असा. किवा जो अतुलनीय शक्तिनें समृद्ध आहे असा. भगवंत आपल्या मुख्यतः तीन शक्ति जगतात प्रकट करतो व त्या आहेत इच्छाशक्ति, क्रियाशक्ति व ज्ञानशक्ति. त्याच्या ह्या दिव्य शक्ती आपल्यामधून शारीरिक, मानसिक व बौद्धिक पातळीवर प्रगट होतात.[1] ह्या त्याच्या तीनही शक्ति व त्यांची एकमेकातील गुंतागुंतीची क्रिडा यातूनच या जगतातील चैतन्याचे क्रियाशील ताणेबाणे विणले जातात. आत्मस्वरूप नारायण हाच ह्या स्पंदनशील जीवनाचा आधार आहे म्हणूनच त्या सर्वज्ञानी ईश्वरास 'अनंतश्री' म्हटले आहे.
(९३) जितमन्युः :  - ज्याने क्रोध जिंकला आहे असा. मन्युः या संज्ञेमधील मतीतार्थ स्पष्टच असल्यानें त्याच्या पुनरावृत्तीची वश्यकता नाही. परंतु क्रोध हा आपल्यामधीलच शत्रु आपल्यावर वर्चस्व गाजवित असतो. व ज्याने क्रोध जिंकला आहे तो आपल्या शुद्ध सत्‌स्वरूपामध्ये प्रतिष्टीत झालेला असतो. यापूर्वीच आपण क्रोध-विकाराची प्रक्रिया विशद केलेली आहे. जेव्हा मनुष्याच्या मनांत इच्छा निर्माण होतात व त्या पूर्ण करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तेंव्हा अतृप्तीमुळे त्या अडचणी विरूद्ध मनुष्याच्या मनांत क्रोध भडकतो. आत्मा हा परिपूर्ण असल्यानें त्याला कशाचीही इच्छा, गरज, अगर अपूर्णता नाही. त्यामुळे श्रीनारायणाजवळ हा क्षुद्र आत्मघातकी क्रोध कधीही वास्तव्य करीत नाही.
(९३) भयापह :  - जो सांसारिक भय दूर करतो नाहीसे करतो तो. तुफान वासनांच्या सागर लाटांमध्ये सापडलेली व त्यांच्या निर्घृणतेने सतत डगमगणारी जीवननौका शांततेचे व पूर्वस्थैर्याचे सुख मिळवूं शकेल असे एकच आश्रयस्थान आहे ते म्हणजे श्रीनारायण.
(९३) चतुरस्त्रः :  - जो सर्व बाजू सर्वतर्‍हेने समर्थपणे सांभाळतो असा. चतुरस्र ही संज्ञा भूमितीमध्ये चारही बाजू समान असणार्‍या चौकोनास दिली जाते, श्री नारायण सर्वांना त्यांची कर्मफले समानतेने देतो. जो तो आपल्या पूर्वकर्मानुसार योग्यच बक्षिस मिळवितो. म्हणून न्यायानें व योग्य तर्‍हेने फल देणारा नारायण चतुरस्र आहे.
(९३) गभीरात्मा :  - मनासारख्या दुर्बल साधनानी ज्याच्या खर्‍या स्वरूपातील गंभीरतेचा, खोलीचा कधीच ठाव लागू शकत नाही तो गभीरात्मा श्री नारायण होय. या ठिकाणी गंभीरता म्हणजे खोली किवा व्यापकता. विश्वाला व्यापून असणारे ते परमतत्व अत्यंत महान् व अमर्याद गूढ (खोल) आहे.[2]
(९३) विदिशः :  - जो दानामध्ये वैशिष्ठ्यपूर्ण आहे असा. त्याची उदारता दिव्य, भव्य असल्यानें सर्व खर्‍या भक्तांच्या प्रामाणिक इच्छा पूर्ण करण्यामध्ये परिपूर्ण आहे.
(९३) व्यादिशः :  - आपले शासनादेश कार्यवाहीत आणण्यामध्ये जो समर्थ आहे असा. तो सर्व पंचमहाभूते, देव देवतांस कार्याचे आदेश देतो.
(९४०) दिशः :  - जो उपदेश देतो व ज्ञानही देतो असा. तो परमात्माच वेदांचाकर्ता आहे, त्याचा मुख्य विषय व तत्त्वही तोच आहे. श्रीनारायण श्रुतींच्या रूपांनें मनुष्यास स्वतःचे म्हणजेच आत्मस्वरूपाचे ज्ञान देतो.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   अनुक्रमे शरीराच्या कार्यातून क्रियाशक्ति, मनाच्या कार्यातून इच्छाशक्ति व बुद्धिमधून ज्ञानशक्ति आपल्या अनुभवास येते.
[2]   निम्नं गभीरं गंभीरम् । अमरकोश.