23 November, 2008

नामसाधना - ४

नामसाधना - ४
मागे आपण पाहिले की - When we concentrate on a thought, the thought becomes true because our bodies transform it into action - हे कसे काय होते ?
आपण जेव्हां विचार करतो तेव्हां आपल्या अंतरंगात विचार तरंग निर्माण होतात. ज्या प्रकारची आपली विचार स्पंदने असतात त्याप्रकारची एक frequency निर्माण होते. आपल्याला वाटते की आपले विचार, विचार तरंग आपल्यापुरतेच मर्यादित असतात. पण तसे होत नाही. आपले विचार तरंग वातावरणात, आपल्या अवतीभवती असलेल्या space मध्ये पसरतात. मग एक महत्त्वाची क्रिया घडते आणि ती म्हणजे ज्या frequency चे आपले विचार आहेत ते त्याच frequency चे विचार शोधतात आणि त्या विचारांना उत्तेजित करतात. आपले विचार जर आनंदाचे असतील तर आनंदाची frequency घेऊन हा विचार बाहेर जातो आणि आपल्या आजूबाजूला आनंदाची frequency जागृत करतो, वातावरणात आनंदाच्या frequency जागृत करतो, इतर व्यक्तिंच्यात देखील आनंदाच्याच frequency जागृत करतो. ह्या कृतीला resonance म्हणतात. पण ह्या resonance प्रमाणे आसपासच्या इतर व्यक्ति लगेच आनंदित होतात काय ? तसे तर आपल्याला कधी दिसत नाही. कारण दोन frequencies जेव्हां जुळतात - match होतात - तेव्हांच resonance तयार होतो हा नियम आहे. मग आपल्या आनंदाच्या frequency चे होते काय ? त्याचे पडसाद जाणवत का नाहीत. ह्याचे कारण म्हणजे हा परिणाम अति सूक्ष्म स्तरावर असतो. एका मोठ्या पाण्याच्या पिंपात मिठाचा एक खडा टाकावा तसे. अर्थात् आनंदाच्या frequency बाहेर पडल्यास जशा आनंदाच्या ऊर्मी पसरतात तशाच दुःखाच्या, क्रोधाच्या, भितीच्या विचारांच्याही frequencies बाहेर पसरतात. आनंदाचे तरंग हे लांब पल्ल्याचे म्हणजे higher frequencies असतात, आणि मोह, लोभ, मद, मत्सर ह्यांच्या कमी अधिक प्रमाणात पण आनंदाच्या frequencies च्या तुलनेत कमी दाबाच्या, म्हणजे lower frequencies असतात. आता आपल्या सुदैवाने म्हणा ह्या system मध्ये एक नियम आहे. Higher frequencies can affect lower frequencies but not viceversa. म्हणजे आपल्या जवळील व्यक्ति दुःखात असली आणि त्याच्या दुःखाची level जर पाण्याच्या पिंपाएवढी नसून जर एका कपाएवढी असेल तर कदाचित काही वेळाने त्याचे दुःख जवळील आनंदाच्या frequency ने निवळेल. ह्याच नियमानुसार तुम्ही जर आनंदात असाल आणि जवळची व्यक्ति कोणत्यातरी विचाराने (भूतकाळातील अप्रिय घटना वा भविष्यातील चिंता) उद्विग्न वा शोकावस्थेत असेल तर त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. म्हणजे त्याच्या विचारांची lower frequency आपल्या विचारांच्या higher frequency वर परिणाम करून शकत नाही. तसेच पवित्र ठिकाणी, देवळात, मठात तेथील वातावरणामुळे बहुधा प्रसन्न होण्यास अनुकूल अशा frequencies असतात, कारण बहुतेक मंडळी त्याच प्रकारचे विचार घेऊन तेथे वावरत असतात. [मंडळी तुमचा अनुभव काय आहे ? हां पण जवळील व्यक्तिवर बेतलेली दुःखद घटना, आणि दुःखद विचारामुळे तो शोकाकुल झाला आहे का ? ह्या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण तपासतो आहोत ते विचारांच्या frequencies चे परिणाम; घटनांचे परिणाम नव्हे; हे लक्षात ठेवून आपल्या अनुभवाचे निरीक्षण करावे]
आपण पाहिले की विचारांचे तरंग बाहेर पडतात आणि तत्सम तरंगांशी ते एकरूप होऊन तशा प्रकारचे वातावरण निर्माण करतात, आणि त्यानुसार वातावरणावर परिणाम होतो. ह्याच न्यायाने वातावरणातील frequencies ना आपणही आकर्षित करून घेत असतो. आपण जरा खिन्न झालो (lower frequency) की खिन्न प्रकारचे तरंग आपल्यावर परिणाम करायला टपून बसलेलेच आहेत म्हणा. म्हणजे आपण ज्या पद्धतीचे विचार करतो त्या पद्धतीच्याच गोष्टी आपण आपल्याकडे आकर्षित करीत असतो. म्हणजे आपण जर नेहमी सकारात्मक विचार करीत असलो तर वातावरणातील सकारात्मक विचारच आपण आकर्षित करून घेऊ. तसेच failure, disease, finance, low self esteem, I can never do that, inferiority complex इत्यादि संबंधीचे नकारात्मक विचार घेऊन वावरत असू तर, तर त्याचे परिणाम आपण सर्वत्र पाहतोच आहोत. - म्हणून ही frequency, resonance प्रणाली लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सुमारे दहा वर्षापूर्वी मी ' रेकी ' चा अभ्यास करीत असताना मला quantum or string theory बद्दल काहीच कल्पना नव्हती. पण रेकीचा अभ्यास करताना मला एवढे समजले की आपल्या शरीरातील मध्य बिंदुपासून शरीराबाहेर सुमारे एक ते दीड फूट एवढे एक सूक्ष्म शरीर असते, त्याला etheric body म्हणतात; ज्याच्यावर आपले स्थूल शरीर आधारलेले आहे. [भाषांतर अवघड होत असल्या कारणाने मी एक परिच्छेदच उद्धृत करतो -
Penetrating the physical body is a more subtle body, vibrating at a higher frequency. This second body has come to be known as the etheric body. The etheric body contains an energy blueprint upon which the physical body is shaped and anchored. It contains the structures that allow us to absorb high-frequency energy of various kinds including the vital force (prana). It processes them and passes them into the physical. These etheric structures were seen by Indian seers (rishis) who called hem as Chakras].
ह्या सर्व गोष्टींचा 'नामस्मरणा'शी संबंध काय ? माझ्या मते आहे. मनात, बुद्धीत उत्पन्न होणार्‍या विचारांबद्दल जागरून राहून शुद्ध विचार पृष्ठभागी ठेवणे, त्याद्वारे मलीन वासनांचे शुद्धीकरण करणे, मलीन वासनांचे निर्दाळण करून चित्त व वृत्तिंची प्रचंड धाव, उधळण आटोक्यात आणणे आणि सरतेशेवटी मन प्रसन्न, शांत, तृप्त, उत्साही, निष्काम व आनंदी राहणे ह्या सर्वांचा आपल्या विचारांच्या qualitative परिणामाशी संबंध आहे असे मला वाटते. पाहू पुढे पटण्यासारखे आहे का ?
क्रमशः

1 comment:

Anonymous said...

Namaskar,
Nam sadhnevar chan likhan chalu aahe. Asech lihit raha aani adhikhaadhik mahiti purvat raha.

Aaplya pudhil lekhana chi vat pahat aahot.

Regards,
Gauri