श्लोक ६९
कालनेमिनिहा वीरः
शौरिः शूरजनेश्वरः ।
त्रिलोकात्मा
त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः ।।
(६४२) कालनेमिनिहा :
- कालनेमि या असूराचा विनाश करणारा असा. 'काल' ही बुद्धिने निर्माण केलेली
संकल्पना आहे. व तो परमात्मा बुद्धिच्या अतीत असल्यानें तो बुद्धि निर्मित कालाचा
नाश करणारा आहे.
(६४३) वीरः : -
विजयी शूर. जो नित्य विजयी पावतो
असा.
(६४४) शौरिः :
- शूरसेनाचे कुलांत उत्पन्न झालेला तो शौरी. पुराणांत ज्याला उत्कलदेश असे
म्हटलेले आहे. तेथे जगन्नाथाच्या रूपाने तो अवतरला. त्याचे सामर्थ्य अप्रतिहत
असल्यानें तो अत्यंत शूर आहे.
(६४५) शूरजनेश्वरः :
- शूरजनांचा स्वामी. श्री नारायण सर्व सामर्थ्ययवान शूरांमध्येही अग्रगण्य आहेत म्हणून सर्व विजयी पुरुष त्याचीच प्रार्थना करतात. इन्द्रादि देवही त्याचेचपासून सामर्थ्य प्राप्त करून घेतात. अशा सामर्थ्याचे तो उगमस्थान
आहे.
(६४६) त्रिलोकात्मा : - सत्यस्वरूप तीनही लोकांचा आत्मा. हे
तीन लोक म्हणजे तीन अनुभव क्षेत्रे होत, जागृत, स्वप्न, सुषुप्ति. व ह्या तीनही क्षेत्रांचा अनुभव शुद्ध चैतन्याच्या आधारानेच घेता
येतो. आत्मा प्रकाशाच्याच साहाय्याने जागृत, स्वप्न पाहनारा वा
झोपलेला मनुष्य आपल्या अनुभवांचे ज्ञान करून घेतो. म्हणूनच श्रीनारायण तीनही लोकांचा स्वामी - त्रिलोकात्मा
आहे.
(६४७) त्रिलोकेशः :
- तीनही लोकांचा स्वामी, ईश. श्रीनारायणाच्याच
आधाराने सर्व कर्म प्रत्यक्षांत येते व त्याचे शिवाय कर्म अशक्यच आहे. म्हणून
त्याला कर्माध्यक्ष म्हटले जाते. जेव्हा जीचनाचे अस्तित्व शरीरांत असते तेंव्हाच सर्व प्रकारचे अनुभव घेतां
येतात. व जेव्हा ते शरीरातून जाते तेंव्हा सर्व कर्म थांबते. अर्थात श्रीनारायणच
प्राणीमात्रामधील चैतन्य प्रकाश असल्यानें तीनही लोकांचा स्वामी आहे.
(६४८) केशवः :
- ज्याचे केस लांब व सुंदर आहेत असा. हे श्रीकृष्णाचे नांव प्रचलित आहे. त्याचे हीच त्याची तजस्वी
किरणे आहेत व ती चंद्र सूर्य इत्यादि विश्वातील तेजोगोलांनाही प्रकाशित करतात
म्हणून महाभारतात म्हटले आहे, 'चंद्र सूर्यांना प्रकाशित करणारी किरणें माझे केश
आहेत म्हणून विद्वान ब्राह्मण मला 'केशव' म्हणतात. तसेच क म्हणजे सृष्टिकर्ता
ब्रह्मा, इश म्हणजे महेश संहार कर्ता व हे दोन्हीही श्रीविष्णु (व) पासून उत्पन्न झाले म्हणून
श्रीविष्णु 'केशव' होय.
(६४९) केशिहा :
- केशी असूराचा नाश करणारा तो केशिहा.
(६५०) हरिः : -
हरण करणारा. या ठिकाणी भगवंताला 'नाश करणारा' अशी संज्ञा दिली आहे. तो श्रीहरि भ्रमात्मक
मूल्यांचा नाश करतो. या भ्रमाने मनुष्याने आपल्या आयुष्यात अंतर्गत संघर्ष व
परिणामतः बाह्य जगाशी बेसूर संबंध निर्माण केले आहेत. आपल्या दिव्य स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे मनुष्य आपल्या व
इतरांच्याही जीवनांत भ्रम व दुःख निर्माण करतो त्यालाच ’संसार’ म्हणतात. श्रीनारायण
आपल्या भक्तजनांचे हे संसारदुःख हरण करतो नाश करतो म्हणून तो 'हरि' आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.
No comments:
Post a Comment