19 January, 2008

नाम व प्रारब्धभोग -

अध्यात्म रामायणात लक्ष्मण एके ठिकाणी म्हणतो -

सुखं वा यदि वा दुःखं स्वकर्मवशगो नरः ।
यद्यद्यथागतं तत्तद्‌ भुक्त्वा स्वस्थमना भवेत्‌ ॥ (अध्यात्म रामायण २.६.७)
स्वतःच्या प्रारधानुसार माणसाने जे जे सुख अथवा दुःख जसे येईल तसे ते भोगून स्वस्थ मनाने राहावे. श्रीमहाराज आजच्या (१९ जाने) प्रवचनात म्हणतात - नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहात नाही. लक्ष्मण पुढे म्हणतो -
मे भोगागमे वाञ्छा न मे भोगविवर्जने ।
आगच्छत्वथ मागच्छत्वभोगवशगो भवेत्‌ ॥
आपण भोगांच्या प्राप्तीची इच्छा करू नये. भोग येऊ नयेत अशी इच्छाही नाही. माझ्याकडे भोग येवोत अथवा न येवोत, असे मानून माणसाने भोगांच्या अधीन होऊ नये.
श्रीमहाराज म्हणतात - नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही. नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्त्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून . . .

http://shribrahmachaitanya.googlepages.com/प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्यमहाराज१९जानेवारी

No comments: